Homeताज्या बातम्याडीआरपीची 'की टू की' योजना बासनात ?

डीआरपीची ‘की टू की’ योजना बासनात ?

गणेशनगर–मेघवाडीतील रहिवाश्यांना ७ दिवसात घरे खाली करण्याची डीआरपीची नोटीस…

 

मुंबई, दि. २४ : अजय मगरे

 

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अनेक नागरिकांना अपात्र केल्यानंतर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाने आणखी काही कुटुंबियांना बेघर करण्याचा विडा उचलला आहे. प्राधिकरणाने जाहीर केलेला ‘की टू की’ प्रकल्प बासनात गुंडाळल्याचे समोर आले आहे. धारावीतील गणेशनगर–मेघवाडी परिसरातील ४२ रहिवाशांना ७ दिवसांत घरे रिकामी करण्याचा आदेश देत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नोटीस बजावल्याने परिसरात चिंतेचे व संतापाचे वातावरण आहे. अचानक आलेल्या या नोटीसमुळे धारावीतील नागरिक धास्तावले आहेत.

 

धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन अद्याप अंतिम झालेला नाही. यानंतरही सरकारकडून धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील विविध भागात जमिनी उपलब्ध करून देत आहे. अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन या जागांवर करण्याचे डीआरपीने ठरवले आहे. त्यानुसार धारावीतील झोपड्यांचा सर्वे करण्यात आला असून काही भागातील रहिवाशांची पात्र अपात्र यादी जाहीर करण्यात येत आहे. हे काम सुरू असतानाच डीआरपीने धारावीतील काही झोपडपट्टीधारकांना बेघर करण्याची नोटीस जारी केली आहे.

 

धारावी पुनर्विकास प्रकल्प की टू की पद्धतीने राबवण्याचा निर्णय डीआरपीने जाहीर केला होता. मात्र या योजनेला धाब्यावर बसवत धारावीकरांना बेघर करण्याचा डाव डीआरपीमार्फत सुरू असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. गणेशनगर–मेघवाडीतील झोपडीधारकांना तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतराची सक्ती करण्यात आली आहे. घरे न खाली केल्यास महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ च्या कलम ३३ व ३८ अन्वये बळाचा वापर करून झोपड्या हटविण्याचा इशारा देण्यात आला आहे. नोटीस मिळताच गणेशनगर–मेघवाडी परिसरात डीआरपीच्या कारभाराविरोधी मोठी चर्चा रंगली आहे. “विकास हवा पण मानवी सन्मानाने; जबरदस्ती नाही,” अशी भूमिका रहिवाश्यांनी घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...
error: Content is protected !!