कोपरगाव, दि. १५ : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यातील बंजारा समाजाचा समावेश एस.टी. (अनुसूचित जमाती) प्रवर्गात करण्यात येत असल्याचा तीव्र विरोध व्यक्त करत, हा निर्णय तातडीने थांबवावा, अशी मागणी आज विविध आदिवासी समाज व संयुक्त संघटनांनी केली. या मागणीचे निवेदन तालुका तहसिलदार सांवत आणि शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना देण्यात आले.

निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गात सामावून घेतल्यास मूळ आदिवासी समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक हक्क धोक्यात येतील. त्यामुळे शासनाने तातडीने या निर्णयाला स्थगिती द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
संयुक्त संघटनेतर्फे २९ सप्टेंबर रोजी कोपरगाव तहसिल कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी विविध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
या ऐतिहासिक मोर्चाचे नेतृत्व एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब करणार असून आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
निवेदन सादर करताना उपस्थित पदाधिकारी : सुभाष पवार – जिल्हा संपर्क प्रमुख,उत्तम पवार – ता. अध्यक्ष, कोपरगाव,निलेश ठाकरे – ता. कार्याध्यक्ष,कोपरगाव,वाल्मिक गोधडे – टायगर फोर्स ता. अध्यक्ष ,बाळासाहेब मोरे – ता. उपाध्यक्ष,अनिल सोनवणे – विद्यार्थी संघटना ता. अध्यक्ष
अनिल सोनवणे – टायगर फोर्स ता. उपाध्यक्ष,बाबासाहेब बर्डे – विद्यार्थी संघटना ता. उपाध्यक्ष
रघुनाथ माळी – ता. संघटक,नाना पवार – ता. संपर्क प्रमुख,कृष्णा माळी – ता. खजिनदार,विनोद माळी – ता. मार्गदर्शक,तसेच – राजेंद्र पवार, जनार्दन सोनवणे, कैलास इंगळे, रोहिदास पिंपळे, श्रावण वाघ, रघु खुरसने, सतीश गोधे, बाळासाहेब मेथाने, नितीन मोरे, संजय गायकवाड, राजेंद्र गायकवाड, विठ्ठल पवार, गंगाधर मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऐतिहासिक मोर्चाचे नेतृत्व एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब करणार असून आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.




















