Homeताज्या बातम्याडिस्टिलरीकडून सांडपाणी शेतात गेल्याची शेतकऱ्यांची तक्रार 

डिस्टिलरीकडून सांडपाणी शेतात गेल्याची शेतकऱ्यांची तक्रार 

कोपरगाव, दि. १० : दिलीप गायकवाड

 

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना गौतमनगर, सुरेगांव, कोळपेवाडी, ता.कोपरगांव, जिल्ह्य अहिल्यानगर,कारखान्याच्या डिस्टिलरी:

विभागाकडून सांडपाणी मौ.कोळगावमाळ, ता.सिन्नर, जिल्ह्य, नाशिक,परिसरातील शेतात गेल्याचा आरोप स्थानिक काही शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात शेतकरी उत्तम मोकळ यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.

मोकळ यांनी तक्रारीसोबत काही छायाचित्रे आणि नकाशे जोडले असून, या प्रकरणात योग्य तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या मते, कारखान्याच्या परिसरातील काही ठिकाणी दूषित पाण्याचा प्रवाह झाल्याने शेती आणि परिसरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

या तक्रारीबाबत सत्यता जाणून घेण्यासाठी बहुजन शक्ती ऑनलाईन न्यूजने घटनास्थळी पाहणी केली असता यावेळी स्थानिक शेतकरी राजु मनोहर मोकळ मारुती थोरात, संपत दादा गवाडे, दशरथ मोकळ, ज्ञानेश्वर मोकळ, लक्ष्मण कारले आदी उपस्थित होते. त्यांनी या बाबतीत प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या संदर्भात कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला असता, डिस्टिलरी विभागाचे जनरल मॅनेजर आभाळे अनुपलब्ध असल्याचे वाचमेनकडून समजले. त्यानंतर सचिव बी.बी. सय्यद यांनी सांगितले की, “या विषयावर मी काही सांगू शकत नाही, अधिकृत भूमिका कार्यकारी संचालक स्पष्ट करतील.”

यानंतर कार्यकारी संचालक एस.एस. बोरनारे यांनी सांगितले की, “पुणे न्यायालयाच्या आदेशानुसार आणि शासनाच्या निर्देशांनुसार आम्ही सर्व नियमांचे पालन करूनच काम करीत आहोत. या प्रकरणावर आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.”

दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे योग्य तपासणी करून दूषित पाणी थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली असून, कारखाना प्रशासनानेही सर्व प्रक्रिया नियमांनुसार सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

कारखान्याचा दावा:

“शासनाच्या निर्देशांनुसार सर्व आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, नियमांचे पालन केले जात आहे.”

शेतकऱ्यांची मागणी:

“सांडपाणी नियंत्रणाबाबत तपासणी करून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...
error: Content is protected !!