Homeताज्या बातम्याबीडीडी चाळ’ला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा द्यावा — मुख्यमंत्री फडणवीस...

बीडीडी चाळ’ला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा द्यावा — मुख्यमंत्री फडणवीस…

विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश; तंत्रज्ञानाधारित नियोजनावर भर

 

मुंबई, दि.३ : अजय मगरे

 

राज्यातील सर्व प्रगतीशील विकास प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात तसेच नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या ‘पायाभूत सुविधा वॉर रूम’ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातील सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ‘बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना केली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्प जून २०२९, वरळी प्रकल्प मे २०२९, आणि एन.एम. जोशी मार्गावरील प्रकल्प जून २०३१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

त्याचबरोबर ठाणे–बोरिवली दुहेरी बोगदा, उत्तन–विरार सी लिंक, आणि ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह शहरी बोगदा या प्रकल्पांचे वेळेत पूर्णत्वासाठी संबंधित यंत्रणांना सूचना करण्यात आल्या. ऐरोली–कटई नाका फ्रीवे प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ २० मिनिटांवर येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

 

वांद्रे–वर्सोवा सी लिंक प्रकल्पाची गती समाधानकारक नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी कामे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गतीमान करण्याचे आदेश दिले.

 

तसेच, मान–हिंजेवाडी–शिवाजीनगर मेट्रो लाईन ३, वडपे–ठाणे रस्ता, आणि मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पही निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

फिल्म सिटी ते खिंडीपाडा (मुलुंड) दुहेरी बोगदा, तसेच वर्सोवा–दहिसर–भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पांना नव्या गतीने पुढे नेण्यासाठी मंजुरी प्रक्रियेत गती आणण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

शेवटी, महावितरण, जलसंपदा आणि सिडकोमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यातील विकास हा लोकांच्या अपेक्षांनुसार आणि वेळेत पूर्ण होईल, यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...
error: Content is protected !!