Homeताज्या बातम्यामुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणात परवडणारी गृहनिर्मिती - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणात परवडणारी गृहनिर्मिती – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ५,३५४ सदनिका व ७७ भूखंडांच्या सोडतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

ठाणे, दि.११ : अजय मगरे

महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून पुढील पाच वर्षांत मुंबई महानगर प्रदेशात परवडणारी घरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, कामकाजी महिला आणि सर्वसामान्यांसाठी वसतिगृहे, भाडेतत्त्वावरील घरे आणि पुनर्विकास प्रकल्पांची अंमलबजावणी ही सरकारची प्रमुख दिशा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाणे पश्चिम येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आज म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ५,३५४ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या संगणकीय सोडतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. या सोडतीत तब्बल १,५८,४२४ अर्जदारांनी सहभाग घेतला, ज्यातून म्हाडावर नागरिकांचा वाढता विश्वास अधोरेखित झाला.

 

या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्र हे गृहनिर्माण धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य आहे. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना नवी गती मिळावी यासाठी म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, एमआयडीसी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका या संस्था युद्धपातळीवर कार्यरत आहेत.”

 

त्यांनी पुढे सांगितले की, “पुढील पाच वर्षांत गृहनिर्माण क्षेत्रात सुमारे ५० लाख कोटींची गुंतवणूक होणार असून ३५ लाख घरांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट आहे.” केंद्र शासनाच्या वस्तू व सेवा कर कपातीमुळे घरांच्या किंमती कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.

 

एमएमआर ग्रोथ हब अंतर्गत २०३० पर्यंत मुंबई महानगर प्रदेशात ३० लाख घरांच्या उभारणीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी आठ लाख घरे म्हाडामार्फत उपलब्ध होणार आहेत.

म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “कोकण मंडळाच्या या चौथ्या संगणकीय सोडतीतून गेल्या तीन वर्षांत एकूण १३,५०० घरे उपलब्ध झाली आहेत. पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या मंडळांमार्फत म्हाडाने तब्बल ४१,५०० घरे सोडतीद्वारे दिली आहेत.”

 

त्यांनी पुढे म्हटले की, “पुढील काळात बीडीडी चाळी, सायन कोळीवाडा, कामाठीपुरा, गोरेगाव, वरळी आणि जोगेश्वरीतील विविध समूह पुनर्विकास प्रकल्पांद्वारे सुमारे दोन लाख नवीन घरे निर्माण होतील. तसेच गिरणी कामगारांसाठी एक लाख पात्र कुटुंबांची निवड पूर्ण झाली असून त्यांना घरे देण्याची प्रक्रिया सुरू आहे.”

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हाडाचे उपअभियंता अभय कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...
error: Content is protected !!