ठाणे, दि.१७.( अजय मगरे )
ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथील पंचशील चाळ व भैय्यासाहेब आंबेडकर चाळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या समस्येची दखल घेत स्थानिक नगरसेविका एकता भोईर व माजी नगरसेवक एकनाथ भोईर (विभाग प्रमुख) यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून नवीन पाइपलाईन टाकण्याचे काम तातडीने हाती घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरात नवीन पाइपलाईन टाकून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी शाखा प्रमुख पांडुरंग कदम, मन्नू तिवारी, संतोष जाधव, आस्वाद गुरव, उपविभाग प्रमुख राजू मोरे, उपशाखा प्रमुख भिकाजी कदम, राजू मगरे, सोन्या कांबळे, किशोर यादव, प्रकाश मगरे, राकेश मोरे तसेच महिला पदाधिकारी रेखा जाधव, सपना मनवळ, उपशाखा संघटक व विभागातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या तत्परतेबद्दल आभार व्यक्त करत भविष्यातही अशाच पद्धतीने प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.




















