Homeताज्या बातम्याअंबिका नगरमध्ये पाणीटंचाईचा भडका....

अंबिका नगरमध्ये पाणीटंचाईचा भडका….

नियमित पाणीपट्टी भरूनही नळ कोरडेच…

ठाणे,दि.१०.( अजय मगरे )

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, नळाला पाणी येत नसल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अंबिका नगरमधील पंचशील चाळ, भैय्यासाहेब आंबेडकर चाळ, भीम गर्जना चाळ या परिसरांना पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. ठाणे महापालिकेच्या जलपुरवठा विभागाच्या निष्क्रियतेचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, परिसरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

नागरिकांकडून नियमितपणे पाणीपट्टी भरली जात असतानाही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जलपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
अनेक भागांमध्ये आठवड्यातून एखाद-दोन वेळाच पाणी मिळत असून, पाण्यासाठी महिलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या चाळीत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

“पाणी नाही, पण बिल मात्र वेळेवर हवे!” अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात असून महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महापालिकेने तात्काळ दखल न घेतल्यास येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. प्रशासन जबाबदारी झटकत आहे का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

याविषयी बहुजन शक्ती न्यूज शी बोलताना वागळे प्रभाग समितीचे उप अभियंता माधव जांगडे यांनी सांगितले की, “अंबिका नगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन पाणी लाईन टाकण्यात येणार असून, लवकरच ही समस्या मार्गी लागेल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; झिशान सिद्दीकींना उमेदवारी देत दिला स्पष्ट सिग्नल

मुंबई -मंगेश म्हात्रे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या...

कोपरगावात रस्त्यासाठी आंदोलन तीव्र; विजय जाधवांचा १ मे रोजी आत्मदहनाचा इशारा

कोपरगाव, दि.३०.( दिलीप गायकवाड ) शहरातील निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय या जुन्या टाकळी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे....

ILS लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी. पुणे बातम्या

संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

टुरिस्ट व्हिसावर ‘धार्मिक प्रचार’ केल्याबद्दल 3 अमेरिकन नागरिकांना ‘भारत सोडा’ची नोटीस मिळाली आहे. पुणे...

टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी 'लिव्ह इंडिया नोटीस' बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; झिशान सिद्दीकींना उमेदवारी देत दिला स्पष्ट सिग्नल

मुंबई -मंगेश म्हात्रे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या...

कोपरगावात रस्त्यासाठी आंदोलन तीव्र; विजय जाधवांचा १ मे रोजी आत्मदहनाचा इशारा

कोपरगाव, दि.३०.( दिलीप गायकवाड ) शहरातील निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय या जुन्या टाकळी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे....

ILS लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी. पुणे बातम्या

संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

टुरिस्ट व्हिसावर ‘धार्मिक प्रचार’ केल्याबद्दल 3 अमेरिकन नागरिकांना ‘भारत सोडा’ची नोटीस मिळाली आहे. पुणे...

टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी 'लिव्ह इंडिया नोटीस' बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...
error: Content is protected !!