कोपरगाव, ता. २९ : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगर-मनमाड-शिर्डी बायपास महामार्गावर वाहतूक ठप्प होण्याची वेळ अनेकदा येत असून, वाहनचालकांना तासन्तास रांगेत अडकून पडावे लागत आहे.

अलीकडच्या दोन दिवसांच्या पावसामुळे पुणतांबा फाटा, बेट नाका, गोदावरी पुल परिसरात पाणी साचले. रस्त्यावर खड्डे, चिखल यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. दरम्यान, गोदावरीवरील लहान पुलावर पाण्याचा प्रचंड वाढलेला पातळीमुळे तो मार्ग बंद करण्यात आला. परिणामी, सर्व वाहतूक मोठ्या पुलावर वळवण्यात आली. मात्र, या पुलाचे अपूर्ण काम व अपुरी क्षमता यामुळे प्रचंड वाहनकोंडी झाली.
त्यातच मुसळधार पावसामुळे जुनी गंगा नदी वाहू लागल्याने आणखी एक पर्यायी मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे प्रवासी, व्यापारी, रुग्णवाहिका व विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “पावसापूर्वीच पुलाचे काम पूर्ण झाले असते, तर आज अशी बिकट वेळ ओढवली नसती.” मात्र पुलाचे काम नेमके कधी पूर्ण होईल हे सांगणे प्रशासनालाही कठीण झाले असल्याचे दिसून येत आहे.




















