ठाणे, दि. २६ ( अजय मगरे )
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, “सर्व घटकांना समान न्याय मिळावा, हीच आमची भूमिका असून त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत राहणार आहोत.”

या संवादादरम्यान आठवले यांनी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व कल्याणाच्या विविध योजना, दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. “देशात सामाजिक समतेसाठी कार्यरत असलेल्या सरकारने समाजाच्या दुर्लक्षित घटकांसाठी अनेक योजना राबवल्या असून त्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत ठाणे जिल्ह्यातील विकासकामे, दलितांवरील अत्याचार, आगामी निवडणुका तसेच आरक्षणासंबंधीचे मुद्दे यावरही प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नांना उत्तर देताना आठवले म्हणाले, “रिपब्लिकन पक्ष हा केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी लढणारा पक्ष आहे. सर्वसामान्यांना हक्क मिळवून देणे हीच आमची प्राथमिकता आहे.”
या वेळी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पक्षाचे
ठाणे शहराध्यक्ष भास्कर वाघमारे,कार्याध्यक्ष प्रल्हादजी मगरे, युवक अध्यक्ष विनोद भालेराव, महासचिव प्रमोद इंगळे, प्रसिद्धीप्रमुख तात्याराव झेंडे, उपाध्यक्ष शहाजी दुपारगुडे, ज्येष्ठ उपाध्यक्ष बबन केदारे, महिला उपाध्यक्ष विमल सातपुते, सुमन ताई इंगळे, महासचिव अशोक कांबळे, युवराज वावळ व मगरे परिवार आरपीआय निरीक्षक साहेबराव सुरवाडे, मनीषाताई करलादस्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आठवले यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधून अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.




















