Homeताज्या बातम्यासायकल टायर-ट्यूबच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणाची मागणी

सायकल टायर-ट्यूबच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणाची मागणी

डुप्लिकेट साहित्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची फसवणूक; कारवाईची मागणी

कोपरगार : ता.११,दिलीप गायकवाड

ग्रामीण भागात आजही सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार तसेच शाळा- कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सायकलचा वापर करत आहेत. मात्र सायकल टायर, ट्यूब व संबंधित साहित्याच्या वाढत्या किमतींसह निकृष्ट दर्जाच्या मालामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सायकल साहित्याच्या किमतींवर नियंत्रण आणावे, अशी मागणी सायकल चालक नागरिकांकडून होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरीब व सर्वसामान्य नागरिक पाच ते दहा किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी आजही सायकलचाच आधार घेतात. दूध विक्री, बाजारहाट, मजुरीसाठी जाणे तसेच दैनंदिन कामांसाठी सायकलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे मोटारसायकलचा खर्च अनेकांना परवडणारा नसल्याने सायकल हेच ग्रामीण भागातील महत्त्वाचे वाहतूक साधन ठरत आहे.

मात्र अनेक सायकल दुकानांमध्ये नामांकित कंपन्यांच्या नावाखाली डुप्लिकेट किंवा रिजेक्टेड टायर-ट्यूब ग्राहकांना विकले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हे साहित्य अल्पावधीत खराब होत असून दुकानदारांकडून कोणतीही हमी किंवा गॅरंटी दिली जात नसल्याची तक्रार आहे. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर वापर किंवा रस्त्याच्या स्थितीवर दोष देत दुकानदार जबाबदारी टाळत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

याशिवाय पंचर, आऊट व इतर सायकल साहित्याच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गरीब नागरिकांना सायकलचा वापर करणेही महागडे ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

डुप्लिकेट टायर-ट्यूब विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, सायकल साहित्याची तपासणी करण्यात यावी तसेच टायर-ट्यूबच्या किमतींवर आणि पंचर भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सायकल चालक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

विक्रोळीतील ६१० घरे आता फक्त HIG साठी; म्हाडाची अर्ज प्रक्रियेला २८ मेपर्यंत मुदतवाढ

म्हाडाचा मोठा निर्णय; अर्जाची मुदतही वाढवली मुंबई : मंगेश म्हात्रे मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर...

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीने पकड घट्ट केली, राष्ट्रवादीच्या...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

नक्षलग्रस्त भागात २४ वर्षे आरोग्यसेवेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला सोयम कोण? राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय...

नवी दिल्ली महाराष्ट्रातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात गेली तब्बल २४ वर्षे निस्वार्थ आरोग्यसेवा देणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम या अचानक राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्या आहेत....

खासगी बसवाल्यांची मनमानी आता बंद? अवैध ट्रॅव्हल ॲप्स विरोधात सरकारचा मोठा ‘ॲक्शन प्लॅन’

तिकीट दरांची लूट थांबवा; परिवहन मंत्र्यांचा थेट आदेश मुंबई -मंगेश म्हात्रे प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून आर्थिक लूट करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर राज्य सरकारने आता...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

विक्रोळीतील ६१० घरे आता फक्त HIG साठी; म्हाडाची अर्ज प्रक्रियेला २८ मेपर्यंत मुदतवाढ

म्हाडाचा मोठा निर्णय; अर्जाची मुदतही वाढवली मुंबई : मंगेश म्हात्रे मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर...

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीने पकड घट्ट केली, राष्ट्रवादीच्या...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

नक्षलग्रस्त भागात २४ वर्षे आरोग्यसेवेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला सोयम कोण? राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय...

नवी दिल्ली महाराष्ट्रातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात गेली तब्बल २४ वर्षे निस्वार्थ आरोग्यसेवा देणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम या अचानक राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्या आहेत....

खासगी बसवाल्यांची मनमानी आता बंद? अवैध ट्रॅव्हल ॲप्स विरोधात सरकारचा मोठा ‘ॲक्शन प्लॅन’

तिकीट दरांची लूट थांबवा; परिवहन मंत्र्यांचा थेट आदेश मुंबई -मंगेश म्हात्रे प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून आर्थिक लूट करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर राज्य सरकारने आता...
error: Content is protected !!