पैठण,दि.४. (अभिजीत सोनवणे )
पैठण तालुक्यातील नांदर येथे दि. ५ नोव्हेंबर, बुधवार रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत.
या निमित्ताने उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गोर्डे, डॉ. सुनिल शिंदे, रविंद्र काळे, तालुका प्रमुख ॲड. किशोर वैद्य आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने करण्यात आले आहे.




















