ठाणे,दि.८.(अजय मगरे)
ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील लोकमान्यनगर परिसरातील जुन्या विहिरींना नवसंजीवनी देण्याच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.
“पाणी म्हणजेच जीवन” या परंपरेला साजेसा असा हा प्रकल्प राबवून परिसरात स्वावलंबी जलव्यवस्थापनाचा आदर्श उभा करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत मोरेवाडी चाळ लक्ष्मीपार्क फेज-१, शंकरमंदिर, लोकमान्यनगर पाडा क्र. २ रेल्वे कॉलनी आणि पाडा क्र. ४ येथील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यात परिवहन मंत्री प्रातप सरनाईक यांनी उपस्थित राहून प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, “आजच्या जलसंकटाच्या काळात पाण्याचे जतन व पुनर्वापर ही काळाची गरज आहे, आणि लोकमान्यनगरने याचा आदर्श घालून दिला आहे.”
कार्यक्रमास विधानसभा सचिव संदीप डोंगरे, समन्वयक प्रदीप खाडे, उपशहर प्रमुख जयंत दरेकर, विभाग प्रमुख रामचंद्र गुरव, संतोष ढमाले, विभाग समन्वयक राजेंद्र कांबळे, माजी नगरसेविका आशा डोंगरे, समाजसेवक राकेश शिंदे, विभाग संघटक टीना डिसोजा तसेच शिवसैनिक उपस्थित होते.




















