पैठण, दि.१५ (अभिजीत सोनवणे)
पैठण शहर व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. या बैठकीस माजी राज्यमंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष अनिल पटेल अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमास पैठण विधानसभा प्रभारी डॉ. सतेंद्र भुसारी, प्रदेश सचिव रवींद्र पा. काळे, तालुका अध्यक्ष विनोद पा. तांबे, शहर अध्यक्ष निमेश पटेल, माजी सभापती महमद हनिफ, रामनाथ चोरमले, महिला तालुका अध्यक्षा अंजली ताई बांगर, बाजार समिती संचालक राजू टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात अनिल पटेल यांनी सांगितले की, “येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांची असून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे. फडणवीस सरकार जातीयतेचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करत आहे. हे सरकार मतांची चोरी करून सत्तेत आले आहे,” अशी टीका त्यांनी केली.
प्रभारी डॉ. सतेंद्र भुसारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “मोदी आणि फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी असून समाजात भेदभाव वाढवत आहेत. राहुल गांधी हे एकटे या अन्यायाविरुद्ध लढत आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेसने स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे ते म्हणाले.
प्रदेश सचिव रवींद्र पा. काळे, तालुका अध्यक्ष विनोद पा. तांबे आणि शहर अध्यक्ष निमेश पटेल यांनीही कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करून काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन केले.
महिला तालुका अध्यक्ष अंजली बांगर, महंमद हनिफ, रामनाथ चोरमले, सदानंद खडसन, रावसाहेब नाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला नंदकिशोर नजन, योगेश जोशी, दत्ता फसाटे, निखिल काळे, संभाजी काटे, रवींद्र आम्ले, अनिल मगरे, हमीद खान सर, मुश्ताक पठाण, रिझवान शेख, भीमराव नवगिरे, आबेद पठाण, गौरव आठवले, चैतन्य बनकर, राहुल दाभाडे, सखाराम पांडव, ऍड. रमेश गव्हाणे, नितीन घटे, प्रकाश निवारे, जकी अन्सारी, योगेश शिपणकर, योगीराज पवार, विशाल तांबे, राजू निवारे, इरफान पठाण, शिवाजी सदलासे, आंबादास ढवळे, हस्नोद्दीन कटारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.




















