Homeताज्या बातम्याठाणेकरांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲम्युझमेंट पार्क...

ठाणेकरांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲम्युझमेंट पार्क…

खाडी किनारी ५० एकरात भारतातील सर्वांत उंच व्हिविंग टॉवर; बीओटी तत्त्वावर विकास

 

ठाणे, दि.१५ : अजय मगरे

 

ठाणेकरांच्या मनोरंजन, पर्यटन आणि क्रीडा सुविधांमध्ये भरीव भर घालणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प लवकरच साकार होणार आहेत. ठाणे खाडी किनारी तब्बल ५० एकर क्षेत्रात भारतातील सर्वांत उंच व्हिविंग टॉवर उभारण्यात येणार असून त्याची उंची २६० मीटर असेल. फ्रान्समधील आयफेल टॉवर ३०० मीटर उंच असल्याने हा टॉवर देशातील मानबिंदू ठरणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुविधा उभारल्या जाणार आहेत. कासारवडवली येथे आधुनिक कन्व्हेन्शन सेंटर, तर कोलशेत परिसरात २५ एकरमध्ये टाऊन पार्क साकारले जाईल. आगरी-कोळी संस्कृतीचे दर्शन घडवणारे संग्रहालय, अत्याधुनिक मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क, ॲम्युझमेंट पार्क आणि ॲडव्हेंचर पार्कही विकसित करण्यात येणार आहेत.

याशिवाय ठाण्यात १२.५ एकरमध्ये पक्षी संग्रहालय, २५ एकरमध्ये भव्य म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर आणि ५० एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. या सुविधांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना उच्च दर्जाच्या क्रीडा-सुविधा उपलब्ध होतील, तसेच शहराचे पर्यटनमूल्य लक्षणीय वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देत ठाणे महापालिकेकडून मीरा-भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडणारा १८.४ किलोमीटर लांबीचा ‘आनंदवन’ हरित पट्टा विकसित करण्यात येणार आहे. या हरित पट्ट्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडून ठाणेकरांचे जीवनमान उंचावेल.

या बहुतेक प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून सर्व प्रकल्प बीओटी (बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर) तत्त्वावर विकसित केले जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे ठाण्याच्या विकासाचा वेग अधिक वाढेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!