ठाणे, दि.२७.( अजय मगरे )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणामुळे स्थगित करण्यात आल्याने राज्यभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
*या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष, ठाणे शहरचे अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून TET पेपरफुटी प्रकरणाची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, या गैरप्रकारातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी* तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



















