ठाणे, दि.१७.( अजय मगरे )
अंबिका नगर नं. २, शिवराय गल्ली येथील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या सार्वजनिक शौचालयातील संडास व बाथरूमला दरवाजे नसल्याचे, तसेच लाईटची (वीज) व्यवस्था नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याने अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या गोपनीयता, सुरक्षितता आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन दरवाजे बसवावेत, वीज व्यवस्था सुरू करावी आणि नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
“कधी होणार सुधारणा?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याबाबत समाजसेवक मिलिंद डोंगरे यांनी संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.




















