Homeताज्या बातम्याम्हाडा संक्रमण शिबिर भाडे प्रकरण तापले; १२१ कोटींची थकबाकी

म्हाडा संक्रमण शिबिर भाडे प्रकरण तापले; १२१ कोटींची थकबाकी

१० बिल्डरांविरोधात खेरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई : मंगेश म्हात्रे

म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे तब्बल १२१ कोटी रुपयांचे भाडे थकविणाऱ्या १० बिल्डरांना चांगलेच महागात पडले आहे. वारंवार नोटिसा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डरांना म्हाडाने चांगलाच दणका दिला आहे. या बिल्डरांविरोधात म्हाडाने खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या (आर.आर. बोर्ड) संक्रमण गाळे विभागाकडून पुनर्विकास प्रकल्पांसाठी विकासकांना तात्पुरते गाळे उपलब्ध करून देण्यात येतात. कमी दरात गाळे उपलब्ध होत असल्याने बिल्डर आपल्या ताब्यात आलेले गाळे परत म्हाडाला वेळेत देत नाहीत. म्हाडाकडून गाळे ठराविक अटी-शर्ती आणि मर्यादित कालावधीसाठी देण्यात येतात. मात्र काही बिल्डरांनी या गाळ्यांचे भाडे वर्षानुवर्षे भरले नाही. विशेष म्हणजे काही बिल्डरांनी कराराची मुदत संपल्यानंतरही गाळ्यांचा ताबा स्वतःकडे कायम ठेवला. तसेच वारंवार नोटिसा देऊनही थकीत रक्कम भरली नसल्याचे संबंधित विभागाच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या दक्षता विभागाच्या सूचनेनुसार उपमुख्य अधिकारी मोहन बोबडे यांनी खेरवाडी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित १० बिल्डरांविरोधात गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, आर.आर. बोर्डाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की, संक्रमण गाळ्यांचे भाडे थकवणाऱ्या इतर बिल्डरांचीही माहिती तपासली जात आहे. ज्यांनी भाडे थकवले आहे त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधिक विभागाला देण्यात आले आहेत.

विकासकाचे नाव.   थकीत भाडे रक्कम

१. मे .९ एम. इन्फास्ट्रक्चर प्रा लि – ११,६५,७०,५००

२. मे. नाखवा अँड जसोल – १२,९१,८४८

३. मे. प्रदिप गोरा गांधी – २,७३,०३,५४३

४. मे. जे. के. बिल्डर्स – ८,००,४७,७०२

५. मे . अलहम्द – ५६,६५,२१०

६. में. वर्धमान- ३७,४२,२२,८१२

७. उदिती – ६०,१३.३६

८. संघवी प्रिमायसेस प्रा. लि. – १३,२०,३६.६९६

९ . आर. आर. बिल्डिर्स- ३५.६०,९१.३२३

१०. मे. हरे कृष्णा चापसी बिल्डिंग – ११,०८,१०,१०२

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...
error: Content is protected !!