Homeताज्या बातम्यासंक्रमण शिबिरास शाहू नगरवासीयांचा ठाम नकार

संक्रमण शिबिरास शाहू नगरवासीयांचा ठाम नकार

धारावी पुनर्विकासावरून वातावरण तापले

मुंबई | मंगेश म्हात्रे

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर माहीम पूर्व येथील शाहू नगर वसाहतीतील रहिवाश्यांनी संक्रमण शिबिरात स्थलांतरास ठाम नकार दिला असून “हक्काचे घर मिळाल्याशिवाय इंचभरही हलणार नाही,” असा एकमुखी निर्धार व्यक्त केला आहे. या मुद्द्यावर शनिवारी सायंकाळी शाहू नगर येथे तातडीची बैठक घेण्यात आली.

शाहू नगर विकास समिती आणि डीआरपी सेक्टर १ रहिवासी कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीत परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. १३ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयात झालेल्या बैठकीत रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतरावर चर्चा झाली होती. मात्र संक्रमण शिबिरात जाण्यास रहिवाशांनी स्पष्ट विरोध दर्शविल्याने हा मुद्दा अधिकच तापला आहे.

नगरसेविका हर्षलाताई मोरे यांनी सांगितले की, धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन अद्याप जाहीर झालेला नसताना रहिवाशांना कुठे घरे देणार याची स्पष्ट माहिती नाही. “अशा परिस्थितीत लोकांना स्थलांतरित करणे अन्यायकारक आहे. प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळेपर्यंत कोणालाही येथून हलू देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक जोसेफ कोळी यांनीही संताप व्यक्त करत शाहू नगर ही धारावीतील सर्वांत चांगली वसाहत असल्याचे सांगितले. “डीआरपी आणि अदानी प्रकल्पामुळे कोळी समाजातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना हलविण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

शाहू नगर भाडेकरू संघाचे माजी अध्यक्ष अरुण जाधव यांनी सांगितले की, “आम्ही आधीच एकदा स्थलांतरित आहोत. पुन्हा संक्रमण शिबिरात पाठविणे हा अन्याय आहे. पुनर्वसन शाहू नगरमध्येच झाले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी रहिवाशांना केले.

बैठकीत चार्ली ऍंथोनी यांनी एकजुटीचे आवाहन करत जनआंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली. “एकजूट हीच आपली ताकद आहे,” असा संदेश त्यांनी दिला.

दरम्यान, शाहू नगर परिसरात अस्वस्थतेचे वातावरण असून आगामी काळात रहिवासी तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. “हक्कासाठी लढू, पण घर सोडणार नाही,” असा आवाज बैठकीत उमटला.

या बैठकीस माजी आमदार बाबुराव माने,दिपक खंदारे डीआरपी सेक्टर १ रहिवाशी कृती समितीचे निमंत्रक आशिष मोरे, विवेक कांबळे, राजेश शर्मा, पत्रकार परेश मोटे तसेच धारावी बचावचे नसरूल हक्क,उलेश गजाकोश,शाखा प्रमूख मुत्तू पट्टन तसेच शाहू नगरचे मकरंद काणे,संजय मानकर,शेखर तोडणकर,विशाल जामदार, व्हिक्टर सालढाणा,दीपक वाघमारे,हरीश लेखक,गजानन पेडणेकर,भूषण नागवेकर,जयेश सैद,सेलिस्टीन रॉड्रिग्स,कुंदन शेजवळ आदी रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बेकायदेशीर फलकांना आळा घालण्यासाठी PMC होर्डिंगवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

बेकायदेशीर फलकांना आळा घालण्यासाठी PMC होर्डिंगवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...
error: Content is protected !!