Homeताज्या बातम्याअहिल्या नगर जिल्हा ‘दलित अत्याचारग्रस्त जिल्हा’ घोषित करावा – प्रा. रामचंद्र भरांडे...

अहिल्या नगर जिल्हा ‘दलित अत्याचारग्रस्त जिल्हा’ घोषित करावा – प्रा. रामचंद्र भरांडे यांची मागणी….

सोनईतील घटनेच्या निषेधार्थ लोक स्वराज्य आंदोलनाची पदयात्रा; विखे पाटील यांच्याशी फोनवर चर्चा

 

अहिल्या नगर, दि. ४ : दिलीप गायकवाड

 

अहिल्या नगर जिल्ह्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, हा जिल्हा ‘दलित अत्याचारग्रस्त जिल्हा’ घोषित करण्यात यावा, तसेच सोनई घटनेतील दोषींना त्वरीत अटक करण्यात येवुन कारवाई करण्यात यावी; पोलिस केस दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणा-या पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे,अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

नेवासा तालुक्यातील सोनई येथील मातंग समाजातील युवक संजय वैरागर याच्यावर गावातील सुवर्ण समाजातील दहा-बारा युवकांनी अमानुष मारहाण करून गाडी चढवली तसेच डोळ्यावर चाकूने वार केल्याची गंभीर घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर दलित संघटनांनी संतप्त होत रास्ता रोको आंदोलन केले.

 

या प्रकरणात लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने प्रा. भरांडे यांच्या नेतृत्वाखाली सोनई ते लोणी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान आंदोलनकर्त्यांनी अत्याचारग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी सोनई पोलीस ठाण्याचे निरीक्षक माळी यांनी तातडीने कारवाई करण्याचे हे राहुरी साखर कारखाना, गुहा फाटा, चिंचोली फाटा आणि कोल्हार येथील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वेळी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पोळ म्हणाले, “अन्याय सहन करण्याऐवजी समाज बांधवांनी संघर्षाची तयारी ठेवावी.”

 

लोणी येथे पोलिसांनी पदयात्रेला अडवले. मात्र आंदोलकांनी विखे पाटील यांना निवेदन देण्यावर ठाम भूमिका घेतल्याने एक तास रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. अखेर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि शिर्डीचे पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी मध्यस्थी केली.

विखे पाटील हे नियोजित दौऱ्यानिमित्त बाहेर असल्याने फोनवर प्रा. भरांडे यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान प्रा. भरांडे यांनी दलितांवरील वाढत्या अत्याचारांचा तपशीलवार उल्लेख करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यावर विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कारवाईचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले.

 

या पदयात्रेत ॲड. नितीन पोळ, ज्ञानेश्वर जगधने यांच्यासह सोनई, उंब्रे, राहुरी, राहुरी फॅक्टरी, गुहा, चिंचोली व कोल्हार येथील समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...
error: Content is protected !!