Homeताज्या बातम्याठाणे रेल्वे स्थानकावर भीषण अपघात; महानगरी एक्सप्रेसखाली पडून तरुणीचा हात खांद्यापासून तुटला

ठाणे रेल्वे स्थानकावर भीषण अपघात; महानगरी एक्सप्रेसखाली पडून तरुणीचा हात खांद्यापासून तुटला

ठाणे,दि.२३.( प्रतिनिधी )

ठाणे रेल्वे स्थानकावर एक भीषण अपघात घडला. स्टेशन मास्तर यांनी अनाऊन्समेंट करून माहिती दिली की प्लॅटफॉर्म क्रमांक 07 वर आलेल्या महानगरी एक्सप्रेसच्या S-5 व S-6 कोचच्या खाली एक महिला पाय घसरून पडली आहे.

 

तत्काळ पोलिस व हमाल घटनास्थळी पोहोचले. महिलेला गाडीखालून बाहेर काढण्यात आले असता तिचा उजवा हात खांद्यापासून पूर्णपणे तुटून वेगळा झाल्याचे आढळले. तसेच उजव्या गुडघ्याच्या वरची कातडी पूर्णपणे निघून आतला मास दिसत असल्याची गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताच्या वेळी महिला पूर्ण शुद्धीवर होती.

 

स्टेशन मास्तर यांचा मेमो घेऊन दोन हमालांच्या मदतीने जखमी महिलेला रुग्णवाहिकेतून छत्रपती शिवाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे अपघात विभागात ड्युटीवरील डॉ. दत्ता यांनी तत्काळ उपचार सुरू केले.

 

जखमी महिलेने आपले नाव सीमा शब्बीर शेख (वय 28 वर्षे, रा. शांतिनगर, मोफतलाल उपनी सुभीता चाळ, रोटीमंगर, कछवामो) असे सांगितले. तिच्या मोबाईलवरून वडिलांना संपर्क करून संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली व त्यांना रुग्णालयात बोलावण्यात आले.

 

डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की महिलेचा हात पूर्णपणे वेगळा झाल्याने आणि येथे शल्यचिकित्सक उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारासाठी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे हलविणे आवश्यक आहे. त्यानुसार महिलेच्या आई-वडिलांनी स्वतःच्या जबाबदारीवर तिला सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले.

 

दरम्यान, जखमी महिलेचा मोबाईल फोन तिच्या वारसांच्या ताब्यात देण्यात आला असून ती उपचारादरम्यान शुद्धीवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

 

*पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...
error: Content is protected !!