मुंबई, दि.९ : मंगेश म्हात्रे :
वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडे लावण्याच्या व्यापक मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, नागपूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर मंडळांत ही मोहीम राबवली जात असून प्रत्येक मंडळाने ठराविक उद्दिष्टे ठेवली आहेत.

मुंबईत विक्रोळी, मालाड, गोरेगावसह विविध प्रकल्पांमध्ये वृक्षारोपण सुरू झाले आहे. पुणे मंडळाने सोलापूर, शिरूर, उजळाईवाडी आदी ठिकाणी रोपण केले. नाशिकमध्ये राह फाउंडेशनच्या सहकार्याने १५ हजार झाडे लावली गेली. कोकणात रायगड जिल्ह्यात ग्रामस्थांच्या सहभागाने तर नागपूर मंडळाने चंद्रपूरसह इतर प्रकल्पांत रोपण सुरू केले.
धाराशीव येथे २० जुलैला सर्वाधिक २० हजार झाडे लावण्याचा उपक्रम होणार आहे. सर्व झाडांची जिओ-टॅगिंग नोंदही होणार आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल म्हणाले, “ही मोहीम केवळ हरित आच्छादन वाढविण्यापुरती मर्यादित नसून भावी पिढ्यांसाठी समृद्ध पर्यावरणाचे शाश्वती देणारी आहे. घरे बांधतानाच पर्यावरण संवर्धन हाही आमचा संकल्प आहे.”




















