ठाणे, दि. १९ : अजय मगरे
ठाणे जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ८७.३ मि.मी. इतके नोंदवले गेले असून आतापर्यंत १९२९.९ मि.मी. (७९.३१%) पावसाची नोंद संध्याकाळी ५ वा. झाली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील उल्हास नदी (जांभुळपाडा परिसर) ने इशारा पातळी ओलांडली असून इतर नद्यांची पातळी अद्याप इशार्याखाली आहे.
धरण साठा : बारवी धरण : १००% भरले, ११ गेट उघडले. तानसा धरण : १००% भरले, २१ गेट उघडले. भातसा धरण : ९३.१३% भरले, ५ गेट व पॉवर आउटलेट २ गेट उघडले. मोडक सागर धरण : ९४.१२% भरले.
पुरस्थिती : तुर्भे (ठाणे तालुका) : EVM वेअरहाऊस परिसरात पाणी साचल्याने नवी मुंबई महापालिकेने पंप लावून पाण्याचा उपसा केला. काटई (कल्याण तालुका) : ११ गाळे व १० घरे पाण्याखाली, अंशतः नुकसान. नांदिवली (कल्याण) : साई कमल सोसायटीतील तळमजल्यावरील १६ रूमपाण्यात. काटेमानिवली (कल्याण) : शिवाजी नगर व वालधुनी परिसरातील अंदाजे १२-१३ घरे तसेच वृंदावन शिवकृपा चाळ, महालक्ष्मी शॉपी येथे ७-८ घरांमध्ये पाणी शिरले.
रेल्वे वाहतूक : ठाणे-कल्याण-कसारा मार्गावर ३० मिनिटे उशीर. ठाणे-कल्याण-कर्जत मार्गावर ३० मिनिटे उशीर. ठाणे-पनवेल-वाशी हर्बर मार्गावर वाहतूक सुरळीत.
दरड दुर्घटना : (ठाणे, लोकमान्यनगर) : पाण्याच्या टाकीमागे पाडा क्र. ४ येथे दरड कोसळून जय मातेरे यांच्या घरावर व शेजारच्या घरावर नुकसान झाले. यात श्री. अमरनाथ शर्मा (वय ७०) जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उपचार सुरू आहेत.
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे




















