Homeताज्या बातम्यान्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी घेतली ५२व्या सरन्यायाधीश पदाची शपथ

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी घेतली ५२व्या सरन्यायाधीश पदाची शपथ

 

नवी दिल्ली,दि.१४ ( प्रतिनिधी )

भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष समारंभात पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कायदा व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

न्यायमूर्ती गवई यांनी निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडून पदभार स्वीकारला. खन्ना यांचा कार्यकाल १३ मे रोजी संपला होता.अमरावती (महाराष्ट्र) येथे २४ नोव्हेंबर १९६० रोजी जन्मलेले न्यायमूर्ती गवई हे आंबेडकरवादी विचारसरणीचे असून, माजी खासदार आणि राज्यपाल राहिलेले रा.सु. गवई यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी १९८५ मध्ये नागपूर विद्यापीठातून बी.ए. एल.एल.बी. पूर्ण केले आणि १९८७ मध्ये वकिलीला सुरुवात केली. न्यायालयीन सेवेत त्यांनी सहाय्यक सरकारी वकील, अतिरिक्त लोक अभियोजक, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली.

 

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठतेनुसार त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रपतींनी २९ एप्रिल रोजी त्याला मंजुरी दिली होती. त्यांचा कार्यकाल २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होईपर्यंत सहा महिन्यांचा असेल.न्यायमूर्ती गवई यांनी आजवर ७०० हून अधिक खंडपीठांमध्ये सहभाग घेतला असून ३०० पेक्षा अधिक निर्णयांचे लेखन केले आहे. त्यांच्या निर्णयांमध्ये संविधानिक, नागरी, फौजदारी, प्रशासकीय आणि पर्यावरणीय कायद्यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गॅस गळतीनंतर रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास, फक्त एकाला ऑक्सिजनच्या आधाराची गरज: डॉक्टर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या प्लॉटवरील पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूच्या गळतीमुळे सायबानगरमधील अनेक रहिवाशांना गुरुवारी पहाटे मळमळणाऱ्या दुर्गंधीमुळे जाग आली...

Pune Gas Leak: पुण्यातील बंद पडलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रूग्णालयात दाखल...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

रस्त्यावरचा आवाज थेट विधान परिषदेत! बच्चू कडूंची शिवसेनेत एंट्री

मुंबई, दि.३०.(प्रतिनिधी) प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडु यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करत “रस्त्यावरचा आवाज...

बारा वर्षांनंतर उलगडा! अपहरणानंतर खून करून प्रेताची विल्हेवाट लावणारे तिघे जेरबंद

ठाणे, दि.३०.( अजय मगरे ) २०१४ साली अपहरण झालेल्या करण अरविंद बागुल (वय २३, रा. दावडी गाव) यांच्या प्रकरणाचा तब्बल बारा वर्षांनंतर धक्कादायक उलगडा झाला...

सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; झिशान सिद्दीकींना उमेदवारी देत दिला स्पष्ट सिग्नल

मुंबई -मंगेश म्हात्रे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या...

गॅस गळतीनंतर रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास, फक्त एकाला ऑक्सिजनच्या आधाराची गरज: डॉक्टर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या प्लॉटवरील पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूच्या गळतीमुळे सायबानगरमधील अनेक रहिवाशांना गुरुवारी पहाटे मळमळणाऱ्या दुर्गंधीमुळे जाग आली...

Pune Gas Leak: पुण्यातील बंद पडलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रूग्णालयात दाखल...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

रस्त्यावरचा आवाज थेट विधान परिषदेत! बच्चू कडूंची शिवसेनेत एंट्री

मुंबई, दि.३०.(प्रतिनिधी) प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडु यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करत “रस्त्यावरचा आवाज...

बारा वर्षांनंतर उलगडा! अपहरणानंतर खून करून प्रेताची विल्हेवाट लावणारे तिघे जेरबंद

ठाणे, दि.३०.( अजय मगरे ) २०१४ साली अपहरण झालेल्या करण अरविंद बागुल (वय २३, रा. दावडी गाव) यांच्या प्रकरणाचा तब्बल बारा वर्षांनंतर धक्कादायक उलगडा झाला...

सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; झिशान सिद्दीकींना उमेदवारी देत दिला स्पष्ट सिग्नल

मुंबई -मंगेश म्हात्रे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या...
error: Content is protected !!