कोपरगाव, दि.२३ ( दिलीप गायकवाड )
फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीच्या सशक्त आधारावर जीवन जगणाऱ्या आणि कुटुंबाला त्या तत्वज्ञानाच्या प्रकाशात घडवणाऱ्या कालकथित तोलाबाई भानुदास बनसोडे यांचे २० एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीत योगदान देणाऱ्या एका जिज्ञासू मातेस आपण मुकलो आहोत.
पतीच्या निधनानंतर त्यांनी तीन मुलांचे समर्थपणे संगोपन करत त्यांना शिक्षण व संस्कारांची साथ दिली. त्यांचा मुलगा ॲड. संभाजी भानुदास बनसोडे हे फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता व मुंबई येथील सिद्धार्थ विहार वसतिगृहात वास्तव्यास राहून कायद्याचे शिक्षण (एल.एल.बी.) घेतलेले आहेत.
सातारा जिल्हा,कराड तालुक्यातील सुरलीगाव रहिवाशी तोलाबाई यांना एक मुलगी व दोन मुले आहेत – मोठी मुलगी कमलताई दिलीप नांगरे, तानाजी भानुदास बनसोडे व ॲड. संभाजी बनसोडे हे सध्या मुंबई येथे स्थायिक आहेत. त्यांच्यामागे नातवंडांचा व आप्तेष्टांचा मोठा परिवार आहे.
त्यांच्या कार्यकर्तृत्वाला व जीवनातील समतेच्या मूल्यांना बहुजन शक्ती सामाजिक संस्था, मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
“समता, शिक्षण आणि संघर्ष यांचे बीज आपल्या कुटुंबात पेरणाऱ्या या मातोश्रींना कृतज्ञतापूर्वक आदरांजली.”




















