Homeताज्या बातम्याकोपरगाव–येवला–मनमाड चौपदरी रस्ता व येवला बायपासचा डीपीआर लवकर सादर करा : मंत्री...

कोपरगाव–येवला–मनमाड चौपदरी रस्ता व येवला बायपासचा डीपीआर लवकर सादर करा : मंत्री छगन भुजबळ

येवला–मनमाड मार्गावरील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याची समीर भुजबळ यांची मागणी

 

मुंबई,दि.११. ( दिलीप गायकवाड )

 

कोपरगाव–येवला–मनमाड मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन एन.एच.१६०एच व एन.एच.७५२जी या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी काँक्रीट रस्त्यात रूपांतर तसेच येवला शहरासाठी बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तत्परतेने सादर करावा, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी हा निर्देश दिला. या बैठकीस आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री भुजबळ म्हणाले की, कोपरगाव–येवला–मनमाड या मार्गावरील वाढती वाहतूक आणि भविष्यातील शहरविकास लक्षात घेऊन चौपदरी काँक्रीट रस्ता व बायपास मार्गाचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. बायपास मार्गासाठी पर्यायी मार्ग निश्चित करताना भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन सर्व आवश्यक यंत्रणांच्या मान्यतांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. या प्रकल्पामुळे येवला शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला–मनमाड मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधले. या मार्गावर वाहनांची वाढती वर्दळ, विशेषतः जडवाहनांची गर्दी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जडवाहनांची वाहतूक पर्यायी मार्गांकडे वळवण्याची गरज असून वाहतूक पोलीस व जिल्हा प्रशासनाने यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांचा होणारा मानसिक त्रास, वेळेचा अपव्यय आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित यंत्रणांनी समन्वयाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...
error: Content is protected !!