Homeताज्या बातम्यागैस दरवाढीचा फटका; ग्रामीण भागात महिलांची पुन्हा चुलीकडे वाटचाल !

गैस दरवाढीचा फटका; ग्रामीण भागात महिलांची पुन्हा चुलीकडे वाटचाल !

महिलांना आले पुन्हा, जुने दिवस !

दावरवाडी, दि.१२ (अभिजीत सोनवणे)

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीचे गंभीर परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर दिसु लागले आहेत. या परिस्थितीचा थेट परिणाम घरगुती वापराच्या वस्तूवर होत असुन, घरगुती गैस सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबाचे मासिक बजेट कोलमंडले आहे. वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. विशेषत ग्रामीण भागात या परिस्थितीचे गंभीर परिणाम दिसून येत आहे.

गैस सिलेंडरच्या किंमतील झालेल्या वाढीमुळे अनेक कुटुंबांना घरखर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना पुन्हा पारंपारिक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गैस सिलेंडर महागल्यामुळे अनेक घरांमध्ये चुलीचा वापर वाढत्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. लाकुडफाटा किंवा शेणकांडयाच्या साहाय्याने स्वयंपाक करण्याची पध्दत पुन्हा सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. गैसच्या वाढत्या किंमतीमुळे महीन्याचा खर्च सांभाळणे अधिक कठीण झाले आहे. आधीच धान्य, भाजीपाला आणि ईतर जीवनावश्यक वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. त्यांमुळे अनेक महिलांना धुराचा त्रास सहन करत पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. यामुळे आरोग्याचाही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गैस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने गैस सिलेंडर दरावर नियंत्रण आणावे आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाढत्या पार्श्वभूमीवर गैस दरवाढीचा प्रश्न आता ग्रामीण भागातील कुटुंबासाठी मोठी चिंता बनली आहे.

 

चौकट

{ गैस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा संताप

आधीच दाळी, तेल, आणि भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात आता गैस सिलेंडर ६० रुपयांनी महागल्याने महिन्याचे गणित कसे जुळवायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे;

 

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सर्वसामान्यांना बसत असुन, व्यावसायिक गैसनंतर घरगुती गैसच्या दरातही वाढ झाली आहे. बुकिंग केलेल्या ग्राहकांनाही वाढीव दरानेच पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे अचानक वाढलेल्या या दरांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

पुण्यातील पाण्याची समस्या : महापालिकेच्या दुरुस्तीला झालेल्या विलंबामुळे दुसऱ्या दिवशीही पुरवठा खंडित. पुणे बातम्या

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची तांत्रिक समस्यांमुळे सकाळची मुदत चुकल्याने पुण्यातील अनेक भागांत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाणीटंचाई आणि...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

पुण्यातील पाण्याची समस्या : महापालिकेच्या दुरुस्तीला झालेल्या विलंबामुळे दुसऱ्या दिवशीही पुरवठा खंडित. पुणे बातम्या

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची तांत्रिक समस्यांमुळे सकाळची मुदत चुकल्याने पुण्यातील अनेक भागांत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाणीटंचाई आणि...
error: Content is protected !!