Homeताज्या बातम्याग्राहकाच्या पैशांची सुरक्षित परतफेड ' गोरक्ष खाडे ' या बेस्ट अधिकाऱ्याच्या...

ग्राहकाच्या पैशांची सुरक्षित परतफेड ‘ गोरक्ष खाडे ‘ या बेस्ट अधिकाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम …

 

मुंबई, दि. २२ : मंगेश म्हात्रे

आजच्या धावपळीच्या, स्वार्थाच्या आणि पैशासाठी धावणाऱ्या काळात प्रामाणिकपणा दुर्मीळ होत चालला आहे. पण तरीही समाजात अजूनही अशा माणसांची उणीव नाही, जे स्वतःच्या प्रामाणिकपणाने व कर्तव्यनिष्ठेने सामान्यांच्या मनात देवासारखी जागा मिळवतात. बेस्टचे अधिकारी गोरक्ष खाडे हे त्यापैकीच एक.

सायन सर्कल डेपो येथे १० सप्टेंबर रोजी माटुंगा कॅम्प येथील रहिवासी फिलिप्स बळीद हे घराचे वीजबिल भरण्यासाठी गेले होते. घाईगडबडीत त्यांनी एक हजार रुपयांच्या ऐवजी तब्बल दहा हजार रुपये दिले आणि नकळत निघून गेले. दिवस गेले, पाचव्या दिवशी ही चूक त्यांच्या लक्षात आली. हाताशी आशेचा किरण नव्हता, मनात प्रचंड टेन्शन होते, पण त्यांनी धैर्य करून पुन्हा खाडे साहेबांकडे धाव घेतली.

फिलिप्स यांनी आपल्या चुकेची कबुली दिल्यावर, खाडे साहेबांनी एका क्षणाचीही उसंत न घेता स्मितहास्य करत सांगितले – “तुमचे नऊ हजार रुपये माझ्याकडे सुरक्षित आहेत.” हे शब्द ऐकता क्षणी फिलिप्स यांचे डोळे पाणावले. एका क्षणात त्यांच्या कपाळावरील आठ्या गायब झाल्या. खाडे साहेबांनी नऊ हजार रुपये परत केले आणि त्यांच्या प्रामाणिक नजरेने पुन्हा एकदा समाजासमोर ‘खरे अधिकारी’ म्हणजे काय याचा आदर्श घालून दिला.

या प्रसंगानंतर भावुक झालेल्या फिलिप्स यांनी सांगितले – “आजच्या काळात इतक्या प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी दुर्मीळ आहेत. खाडे साहेबांचा मनापासून आदर वाटतो. त्यांच्या मोबाईलवरील डीपीवर दिसणाऱ्या ‘माय माऊली’नेच त्यांना असे संस्कार दिले असावेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबाला मनापासून सलाम.”

हा प्रसंग ऐकून बेस्ट कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये खाडे साहेबांविषयीचा आदर अधिक दुणावला आहे. पैशासमोरही न डळमळणारी त्यांची प्रामाणिकता समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...
error: Content is protected !!