Homeताज्या बातम्या१७ सप्टेंबरला देशभरात बुद्धगया–महू–दीक्षाभूमी मुक्तीसाठी जनआक्रोश मोर्चा; 

१७ सप्टेंबरला देशभरात बुद्धगया–महू–दीक्षाभूमी मुक्तीसाठी जनआक्रोश मोर्चा; 

मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एल्गार

 

मुंबई, दि. १५ : अजय मगरे

 

महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरील बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी १७ सप्टेंबर रोजी देशव्यापी जनआक्रोश आंदोलन पेटणार आहे. या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर करणार असून मुंबईत आझाद मैदानावर भव्य जनसागर उसळणार आहे.

 

महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते अनागारिक धम्मपाल व पेरियार स्वामी जयंती तसेच भय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून हा दुसरा टप्पा राबवला जात आहे. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, बौद्ध भिक्खु संघ आणि आंबेडकरी विचाराच्या असंख्य संघटना-मंडळांच्या माध्यमातून हे

आंदोलन उभारण्यात आले आहे.

 

आंदोलनाच्या तीन प्रमुख मागण्या :—

१) बोधगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे द्यावे. बिहार सरकारच्या १९४९ च्या कायद्याने फक्त ४ बौद्ध सदस्यांचा समावेश हा असंवैधानिक असल्याचे स्पष्ट करून हा कायदा रद्द करावा व व्यवस्थापनात डॉ. भीमराव य. आंबेडकर यांचा कायम समावेश करावा……!

२) महू जन्मस्थळ स्मारकाचे व्यवस्थापन आंबेडकरी समाजाकडे द्यावे. मध्यप्रदेश सरकारने उभारलेले हे भव्य स्मारक बाबासाहेबांच्या विचारधारेला विरोधी पद्धतीने चालवले जात असल्याने ते त्वरित दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया/डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याकडे सोपवावे……!

३)नागपूर दीक्षाभूमीवरील बेकायदेशीर कब्जा दूर करून मूळ मालक दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कडे व्यवस्थापन द्यावे. पार्किंगच्या नावाखाली चाललेले विद्रूपीकरण तत्काळ थांबवावे……!

 

मुंबईत आझाद मैदानावर भव्य मोर्चा….

 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर व रायगड जिल्ह्यांचा संयुक्त मोर्चा आझाद मैदानावर सकाळी १०.३० वाजता निघणार असून त्याचे नेतृत्व डॉ. भीमराव आंबेडकर स्वतः करतील. या मोर्च्यातून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

 

या संदर्भात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाचे केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. एस. के. भंडारे यांनी माहिती देत सर्वांनी या अस्मितेच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...
error: Content is protected !!