Homeताज्या बातम्याआरटीई प्रवेशातील १ कि.मी. अट रद्द करा; दादा भुसे यांना वंचित बहुजन...

आरटीई प्रवेशातील १ कि.मी. अट रद्द करा; दादा भुसे यांना वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

मुंबई,दि.२५.( अजय मगरे )

 

राज्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आर टी ई ) विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी घालण्यात आलेली १ कि.मी. अंतराची अट तात्काळ रद्द करावी, अशी जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे.

 

२००९ साली केंद्र सरकारने ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळावा या उद्देशाने ‘राइट टू एज्युकेशन’ कायदा लागू केला. मात्र २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून शाळा प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही अट अन्यायकारक असून गरीब, कामगार, कष्टकरी, माथाडी, शेतमजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कुटुंबांतील मुलांवर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

अनेक वस्त्या व उपनगरांमध्ये १ कि.मी. अंतरात दर्जेदार शाळा उपलब्ध नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना निकृष्ट सुविधा असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागेल किंवा शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येईल. यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या मूळ उद्देशालाच तडा जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

त्यामुळे आरटीई अंतर्गत नव्याने घालण्यात आलेली १ कि.मी. अंतर मर्यादा रद्द करून पूर्वीप्रमाणे ५ कि.मी. अंतर मर्यादा लागू करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार व मुंबई-ठाणे जिल्हा समन्वयक महेश भारतीय यांनी केली आहे.

सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...
error: Content is protected !!