Homeताज्या बातम्याकोपरगावच्या विद्यार्थ्यांचा शिर्डी विमानतळावर शैक्षणिक अभ्यास दौरा..

कोपरगावच्या विद्यार्थ्यांचा शिर्डी विमानतळावर शैक्षणिक अभ्यास दौरा..

विमानाचे टेक-ऑफ-लँडिंग पाहत संत ज्ञानेश्वर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला विमानतळ व्यवस्थापनाचा धडा…

 

कोपरगाव,दि.११.( दिलीप गायकवाड )

 

पुस्तकात विमानांची चित्रे पाहणाऱ्या कोपरगावच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात विमानाचे टेक-ऑफ आणि लँडिंग पाहत ‘विमानाचे उड्डाण’ अनुभवले. येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच शिर्डी (काकडी) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शैक्षणिक भेट दिली. विमानतळ प्राधिकरणाने विशेष परवानगी देत विद्यार्थ्यांना विमानतळाच्या अंतर्गत कामकाजाची माहिती दिली.

संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी झावरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी संचालक विशाल झावरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्या संकल्पनेतून हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या भेटीदरम्यान विमानतळावरील विविध विभागांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखविण्यात आली.

 

प्रवाशांचे तिकीट तपासणी व बोर्डिंग पास प्रक्रिया, बॅगेज तपासणीसाठी वापरली जाणारी आधुनिक यंत्रणा, तसेच अरायव्हल व डिपार्चर विभागाचे नियोजन कसे केले जाते याबाबत अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

 

यावेळी धावपट्टी (रनवे) हे विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. विमानाचे लँडिंग आणि टेक-ऑफ जवळून पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. विमानतळ अधिकाऱ्यांनी धावपट्टीचे व्यवस्थापन व विमानांच्या सिग्नल यंत्रणेचे कार्य समजावून सांगितले.

 

दरम्यान, सीआयएसएफच्या जवानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विमानतळ सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. देशाच्या सुरक्षेत सुरक्षा दलांची भूमिका, शिस्त आणि कर्तव्यभावना याबाबत दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.

तसेच एव्हिएशन क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वैमानिक, एअर होस्टेस, एअर ट्रॅफिक कंट्रोलर यांसारख्या क्षेत्रात कसे प्रवेश करता येतो याबाबत माहिती देण्यात आली.

 

या अभ्यास दौऱ्याबद्दल संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी झावरे पाटील, कार्यकारी संचालक विशाल झावरे, मुख्याध्यापक सचिन मोरे व उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांनी विमानतळ प्राधिकरणाचे आभार मानले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली असून हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...
error: Content is protected !!