Homeताज्या बातम्यादिवंगत पत्रकार बिपिनराव गायकवाड यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून आर्थिक...

दिवंगत पत्रकार बिपिनराव गायकवाड यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून आर्थिक मदत!

कोपरगाव – दि.११ विजय जावरे

 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा कोपरगावचे शहर कार्याध्यक्ष पत्रकार बिपिनराव गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवार, दि. ४ मार्च रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे पत्रकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे व प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या सूचनेनुसार राज्य सरचिटणीस तथा ‘दैनिक समर्थ गांवकरी’चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी बुधवार, दि. ११ मार्च रोजी कोपरगाव येथे गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

 

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तसेच ‘दैनिक समर्थ गांवकरी’च्या वतीने पत्रकार बिपिनराव गायकवाड यांच्या पत्नी कविता बिपिन गायकवाड यांना आर्थिक मदतीचा धनादेश आणि एक महिन्याचे घरगुती किराणा साहित्य सांत्वन म्हणून प्रदान करण्यात आले.

 

या प्रसंगी ‘दैनिक समर्थ गांवकरी’चे व्यवस्थापक संजय फुलसुंदर, राज्य मराठी पत्रकार संघाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप, सचिव विजय कापसे, ज्येष्ठ मार्गदर्शक फकीरराव टेके, किसनराव पवार यांच्यासह गायकवाड कुटुंबातील कविता गायकवाड, महेश बिपिन गायकवाड, कल्याणी बिपिन गायकवाड, जागृती बिपिन गायकवाड, प्रकाश बन्सी गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते.

 

यावेळी डॉ. विश्वासराव आरोटे यांनी गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन करताना सांगितले की, पत्रकार बिपिनराव गायकवाड हे अत्यंत मनमिळावू, शांत स्वभावाचे आणि अभ्यासू पत्रकार होते. त्यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली होती. संघटनेत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती होती. त्यांच्या अचानक निधनामुळे पत्रकार क्षेत्राची मोठी हानी झाली असून गायकवाड कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी भावना व्यक्त करत त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...
error: Content is protected !!