पैठण तालुक्यातील दरेगाव-
पारुंडी परिसरातुन उगम पावणारी आणि नवगाव येथील गोदावरी नदी पात्रात मिसळणारी वीरभद्रा नदी ही साधारण ४०-५० किलोमीटर अंतराचा प्रवास करते. या नदीच्या खोलिकरणामुळे परिसरात जलसंधारण आणि शेतीवर मोठा परिणाम दिसुन येत आहे. नवगाव येथील गोदावरी नदी विलिण होत असून एकुण ५० किलोमिटरचा प्रवास होत आहे. नांदर शिवारात एकुण १.५ किलोमीटर खोलिकरण करण्यात आले असुन, पावसाळ्यात पाण्याचा चांगला संचय होतो. त्यामुळे ३०० हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. नदीपात्रात पाण्याचा उपलब्धतेमुळे उन्हाळ्यात हिरवळीचे आल्हाददायक चित्र पाहायला मिळते.
नदी खोलिकरणाचा या गावांना फायदा; दावरवाडी, डेरा, नांदर, कौंदरसह पाच गांवाना नदी खोलिकरणाचा फायदा झाला आहे. बंधारे व खोलगट भागात पाण्याचा संचय अजुनही कायम आहे. उन्हाळ्यातही काही प्रमाणात पाणी टिकुन राहत असुन भुजल पातळीत सुधारणा झाली आहे.
ऊस , फळबागांचे क्षेत्र दीड हजार हेक्टरने वाढले; पाण्याचा संचय झाल्याने विहीरीतील पाणी पातळी वाढली आहे. तसेच ऊस , मोसंबी या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असुन, यंदाच्या वर्षात दीड हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आले आहे. गहु, हरभरा या सारखे पिके घेता येत असुन, खोलिकरणामुळे पाण्याची चांगली सोय झाली आहे.
छायाचित्र {किशोर तांगडे}




















