Homeताज्या बातम्याधारावीकरांच्या आंदोलनापुढे महापालिका झुकली

धारावीकरांच्या आंदोलनापुढे महापालिका झुकली

धारावीकरांच्या आंदोलनापुढे महापालिका झुकली

महापालिकेने अदानीसाठी घेतलेला निर्णय केला रद्द

मुंबई दि.४ मार्च ( प्रतिनिधी )

धारावीतील म्युनिसिपल चाळी आणि इमारतींच्या हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात महापालिकेने अदानीसाठी घेतलेल्या निर्णयाचा तीव्र विरोध झाल्यानंतर अखेर मनपाला हे पत्रक रद्द करावे लागले आहे. यामुळे धारावीकरांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अखत्यारीतील सर्व जमिनी आणि त्यावरील बांधकामे डीआरपीच्या माध्यमातून अदानीकडे सोपवण्याचा निर्णय पालिकेच्या जी / उत्तर विभागाने घेतला होता. याबाबत ६ फेब्रुवारी रोजी परिपत्रक जारी करण्यात आले होते. या निर्णयामुळे माटुंगा लेबर कॅम्प, शाहू नगर आणि अशा इतर म्युनिसिपल चाळी व इमारतीतील रहिवाशांना त्यांच्या खोलीच्या हस्तांतरणासाठी डीआरपीकडे जावे लागणार होते. यापूर्वी झालेली हस्तांतरण प्रकरणे पूर्ववत करण्याच्या या निर्णयामुळे धारावीतील रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

या विषयी धारावी बचाव आंदोलनाने या निर्णयाचा तीव्र विरोध केला. “धारावीकरांना अदानीकडे शरणागत करण्याचा निंदनीय प्रकार” असे संबोधीत धारावीकरांनी जन आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या शिष्टमंडळाने सहाय्यक मनपा आयुक्त (जी/उत्तर विभाग) यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. हे अन्यायकारक पत्रक त्वरित मागे घेण्याची मागणी करत, हजारो धारावीकरांनी दादर येथील मनपा कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली होती.

या तीव्र आंदोलनाची दखल घेत अखेर महापालिका प्रशासनाने आपला निर्णय मागे घेत, संबंधित पत्रक रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. अशी माहिती “बहुजन शक्ती” न्यूज पोर्टला धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. राजेन्द्र कोरडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे...

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

पहिल्याच पावसात वाहून गेला शिर्डी बायपासचा सर्व्हिस रोड; नागरिकांचा संताप, दर्जेदार कामाची मागणी

कोपरगाव : दिलीप गायकवाड अहिल्यानगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील शिर्डी बायपास मार्गावर कोपरगाव तालुक्यातील पुणतांबे फाटा येथे सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामादरम्यान मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे....

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त मोहनीराज नगरात वटवृक्षाची श्रद्धाभावाने पूजा

कोपरगाव : दिलीप गायकवाड वटसावित्री पौर्णिमेनिमित्त कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील मोहनीराज नगर परिसरात महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची श्रद्धाभावाने पूजा करून सण उत्साहात साजरा केला. यावेळी महिलांनी वटवृक्षाला...

ग्रामीण भाग अंधारात; महावितरणचा गलथान कारभार!

कोपरगाव तालुक्यातील भारनियमन तातडीने बंद करा; शेतकरी नेते रघुनाथ गुरसळ पाटील यांची मागणी कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण भारनियमनामुळे शेतकरी,...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे...

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

पहिल्याच पावसात वाहून गेला शिर्डी बायपासचा सर्व्हिस रोड; नागरिकांचा संताप, दर्जेदार कामाची मागणी

कोपरगाव : दिलीप गायकवाड अहिल्यानगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील शिर्डी बायपास मार्गावर कोपरगाव तालुक्यातील पुणतांबे फाटा येथे सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामादरम्यान मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे....

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त मोहनीराज नगरात वटवृक्षाची श्रद्धाभावाने पूजा

कोपरगाव : दिलीप गायकवाड वटसावित्री पौर्णिमेनिमित्त कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील मोहनीराज नगर परिसरात महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची श्रद्धाभावाने पूजा करून सण उत्साहात साजरा केला. यावेळी महिलांनी वटवृक्षाला...

ग्रामीण भाग अंधारात; महावितरणचा गलथान कारभार!

कोपरगाव तालुक्यातील भारनियमन तातडीने बंद करा; शेतकरी नेते रघुनाथ गुरसळ पाटील यांची मागणी कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण भारनियमनामुळे शेतकरी,...
error: Content is protected !!