सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आणि न्यायासाठी…..
सर्व पक्षीय, सर्व धर्मीय कोपरगावकरांचे 12 मार्चला आत्मक्लेश आंदोलन
कोपरगाव दि.११ ( दिलीप गायकवाड )
मस्साजोगचे सरपंच कै. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी कोपरगावमध्ये सर्व पक्षीय, सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
हे आंदोलन महात्मा गांधी स्मारक चौक, मेनरोड, कोपरगाव येथे 12 मार्च 2025 रोजी सकाळी 9.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत शांततापूर्ण मार्गाने पार पडणार आहे. आंदोलनकर्त्यांनी या काळात अन्न-पाणी न घेत आंदोलन करण्याचा संकल्प केला आहे.
आंदोलनामागील कारणे:
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य आरोपींवर कारवाई झाली असली, तरी धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
या घटनेमुळे लोकशाही, न्यायव्यवस्था आणि समाजातील श्रद्धा व विश्वास हादरला असून, दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा अवमान आणि कायद्याचा गैरवापर थांबविण्यासाठी जनआंदोलन हाच पर्याय आहे.
आंदोलनकर्त्यांमध्ये पुढील नागरिकांचा समावेश: अनिल गायकवाड, भरत मोरे,विनय भगत व अन्य कोपरगावकरांनी या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला आहे.न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.




















