Homeताज्या बातम्याकोपरगावात जेष्ठांसाठी विरंगुळा उद्यानाची मागणी;

कोपरगावात जेष्ठांसाठी विरंगुळा उद्यानाची मागणी;

 ‘कै. वसंतदादा चोरगे’ नाव देण्याचा प्रस्ताव

नगरपालिकेकडे जयहिंद विचार मंचाचे निवेदन

कोपरगाव,दि.२६.दिलीप गायकवाड

शहरातील इनडोअर गेम हॉल शेजारील मोकळी जागा कचर्‍याचे ठिकाण बनत असून नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे. या जागेचा जेष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज विरंगुळा उद्यान म्हणून विकास करून त्यास “जेष्ठ नागरिक कै. वसंतदादा चोरगे उद्यान” असे नामकरण करावे, अशी जोरदार मागणी जयहिंद विचार मंचाने केली आहे.

या संदर्भात मंचाचे उपाध्यक्ष दिलीप घुमरे यांनी मुख्याधिकारी तथा नगराध्यक्ष यांना निवेदन सादर केले. शहरातील इनडोअर गेम हॉल शेजारील जागा सध्या पडून असून काही नागरिकांकडून तेथे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्या जागेचा सुयोग्य वापर करून जेष्ठ नागरिकांसाठी बाके, चालण्याचा ट्रॅक, हिरवळ, वृक्षारोपण, प्रकाश व्यवस्था अशा सुविधा उभाराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले १९७५ सालचे शिंगणापूर येथील रहिवासी कै. वसंतदादा चोरगे यांच्या स्मरणार्थ या उद्यानास त्यांचे नाव द्यावे, अशी नागरिकांची भावना असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कै. चोरगे यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचा किशोर चोरगे उल्लेख केला आहे.

येत्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मान्यता देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी जयहिंद विचार मंचाने केली आहे. आता नगरपालिका प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...
error: Content is protected !!