फळबागांसह अनेक पिकांना मोठा फटका, शेत गेले खरडुन, शेतकरी हवालदिल.
पैठण ता ;(अभिजित सोनवणे)
पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सतत अतिवृष्टी आणी ढगफुटीसद्दृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील ९५ हजार हेक्टरवरील सोयाबीन,ऊस, मका, कापुस, बाजरी, तुर, उडीद, भाजीपाला, फळबागांनमध्ये मोसंबी, डाळिंब, सीताफळ, आदी फळबागांचे प्राथमिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार मुसळधार पावसाने हाहाकर माजवला होता. अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेतिपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे ९५ हजार हेक्टरवरील पिकांसह शेतकरी बाधित झाले आहेत. तालुका प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आकडेवारीनुसार संपूर्ण पंचनामाचे अहवाल हाती आल्यानंतर खरी आकडेवारी समोर येईल. पैठण तालुक्यात महापुरामुळे १२ मंडळातील ११० गावातील सुमारे ९५ हजार २८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे. अशी माहिती तहसीलदार जोत्यी पवार यांनी दिली आहे. गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे गोदाकाठ परिसरातील ग्रामीण भागातील १,६५०० हजार घरात पाणी शिरले होते. यात् एकटा मायगावमध्ये सर्वाधिक घर पाण्याखाली गेली आहेत. याशिवाय पैठण शहरातील सुमारे ५०० दुकाने आणी ९०० घरे पुराच्या पाण्याखाली गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील अनेक रस्ते उखडले असुन पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जोडणारा महामार्गावरील पाटेगाव गावाजवळीर पुल पुर्णपणे उखडला असुन नादुरुस्त झाला आहे.
डोळ्यांदेखत उभी पिके झाली भुईसपाट,
*गेल्या पंधरा दिवसांपूर्वी परिसरात अधिक अतिवृष्टी व ढगफुटीसद्दृश्य पाऊस झाला.
*त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील उभी पिके पाण्याखाली भुईसपाट झाली आहेत. स्थानिकांनी माहीती देतांना सांगितले आहे. आठ ते दहा वर्षांत हा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
** पावसामुळे ग्रामस्थ, औद्योगिक वसाहतीतील कामगार, दुध उत्पादक शेतकरी यांचे आंतर्नात हाल झाले आहे.




















