Homeताज्या बातम्यानीट-यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटीविरोधात ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

नीट-यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटीविरोधात ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

प्रश्नपत्रिका फुटी, शिक्षणातील भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी निवेदन सादर

 

ठाणे, दि.३०.प्रतिनिधी

नीट-यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणाच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 29 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले.

 

देशातील नीट-यूजी 2026 परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि पालकांच्या आर्थिक व मानसिक संघर्षावर पाणी फेरले गेल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

 

निवेदनामध्ये नीट-यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढावे, सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांचा प्रतिबंध) अधिनियम 2024 ची कठोर अंमलबजावणी करावी, तसेच राधाकृष्णन समितीच्या शिफारशी तात्काळ लागू करून नीट परीक्षेची जबाबदारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (NTA) काढून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सोपवावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

 

याशिवाय देशभरातील प्रश्नपत्रिका फुटीच्या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि शिक्षणातील वाढते व्यापारीकरण रोखण्यासाठी खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवणारा स्वतंत्र कायदा लागू करण्यात यावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

 

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी हा लढा यापुढेही सुरू राहील, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

 

आंदोलनात अनिकेत बंडू मोरे (जिल्हाध्यक्ष), राजू खरात (महासचिव), कमलेश उभाळे (कल्याण-डोंबिवली शहराध्यक्ष), सुशांत साबळे यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...
error: Content is protected !!