Homeताज्या बातम्याबारा वर्षांनंतर उलगडा! अपहरणानंतर खून करून प्रेताची विल्हेवाट लावणारे तिघे जेरबंद

बारा वर्षांनंतर उलगडा! अपहरणानंतर खून करून प्रेताची विल्हेवाट लावणारे तिघे जेरबंद

ठाणे, दि.३०.( अजय मगरे )

२०१४ साली अपहरण झालेल्या करण अरविंद बागुल (वय २३, रा. दावडी गाव) यांच्या प्रकरणाचा तब्बल बारा वर्षांनंतर धक्कादायक उलगडा झाला आहे. गुन्हे शाखा, घटक-०३, कल्याण यांच्या पथकाने या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केली आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये अपहरणाचा गुन्हा (क्र. ६४०/२०१४, भा.द.वि. कलम ३६५) दाखल होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी चंद्रकांत बाळाराम गायकर (वय ३९, रा. डोंबिवली पूर्व) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून केलेल्या चौकशीत संपूर्ण कट उघडकीस आला.

तपासात समोर आले की, सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५५, व्यवसाय – कन्स्ट्रक्शन) याचा करण बागुल याच्यासोबत जमीन व्यवहारावरून वाद झाला होता. या वादातून ४ ऑक्टोबर २०१४ रोजी पाटील याने बागुल याचे अपहरण करून त्याला दावडी येथील आपल्या ऑफिसमध्ये नेले. तेथे लोखंडी रॉडने डोक्यावर व तोंडावर वार करून त्याचा खून करण्यात आला.

यानंतर आरोपी सुरेंद्र पाटील, चंद्रकांत गायकर आणि सुरेश गोपाल देगावत उर्फ छोटू (वय ३२) यांनी मिळून मृतदेह स्विफ्ट कारमधून मुरबाड तालुक्यातील बारवी डॅम परिसरातील घनदाट जंगलात नेऊन अज्ञातस्थळी विल्हेवाट लावली.

दरम्यान, ७ ऑक्टोबर २०१४ रोजी मुरबाड पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता (अकस्मात मृत्यू नोंद क्र. ४७/२०१४). तपासाअंती हा मृतदेह करण बागुल याचाच असल्याचे आता निश्चित झाले आहे.

या प्रकरणात आता भा.द.वि. कलम ३०२ (खून), २०१ (पुरावे नष्ट करणे) आणि ३४ (सामूहिक हेतू) यांची भर घालण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गॅस गळतीनंतर रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास, फक्त एकाला ऑक्सिजनच्या आधाराची गरज: डॉक्टर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या प्लॉटवरील पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूच्या गळतीमुळे सायबानगरमधील अनेक रहिवाशांना गुरुवारी पहाटे मळमळणाऱ्या दुर्गंधीमुळे जाग आली...

Pune Gas Leak: पुण्यातील बंद पडलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रूग्णालयात दाखल...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

रस्त्यावरचा आवाज थेट विधान परिषदेत! बच्चू कडूंची शिवसेनेत एंट्री

मुंबई, दि.३०.(प्रतिनिधी) प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडु यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करत “रस्त्यावरचा आवाज...

सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; झिशान सिद्दीकींना उमेदवारी देत दिला स्पष्ट सिग्नल

मुंबई -मंगेश म्हात्रे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या...

कोपरगावात रस्त्यासाठी आंदोलन तीव्र; विजय जाधवांचा १ मे रोजी आत्मदहनाचा इशारा

कोपरगाव, दि.३०.( दिलीप गायकवाड ) शहरातील निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय या जुन्या टाकळी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे....

गॅस गळतीनंतर रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास, फक्त एकाला ऑक्सिजनच्या आधाराची गरज: डॉक्टर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या प्लॉटवरील पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूच्या गळतीमुळे सायबानगरमधील अनेक रहिवाशांना गुरुवारी पहाटे मळमळणाऱ्या दुर्गंधीमुळे जाग आली...

Pune Gas Leak: पुण्यातील बंद पडलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रूग्णालयात दाखल...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

रस्त्यावरचा आवाज थेट विधान परिषदेत! बच्चू कडूंची शिवसेनेत एंट्री

मुंबई, दि.३०.(प्रतिनिधी) प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडु यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करत “रस्त्यावरचा आवाज...

सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; झिशान सिद्दीकींना उमेदवारी देत दिला स्पष्ट सिग्नल

मुंबई -मंगेश म्हात्रे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या...

कोपरगावात रस्त्यासाठी आंदोलन तीव्र; विजय जाधवांचा १ मे रोजी आत्मदहनाचा इशारा

कोपरगाव, दि.३०.( दिलीप गायकवाड ) शहरातील निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय या जुन्या टाकळी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे....
error: Content is protected !!