दावरवाडी,दि.6.(अभिजीत सोनवणे)
दावरवाडी ता पैठण येथे आशिष ग्राम रचना ट्रस्ट, पाचोड आणि ग्रुप ग्रामपंचायत दावरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंधक जनजागृती अभियान गुरुवारी दि 5 डिसेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय समोर राबविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर येथे सकाळी साडेआठला सुरू झालेल्या या कार्यक्रमात विविध मार्गदर्शन करण्यात आले. जसे की अल्पवयीन मुलीचे लग्न करू नये, मुलगी १८ वर्षीय झाल्याशिवाय तिचे लग्न करावे, शासनाने कायदे कडक केले असून, लहानपणी लग्न करणे, म्हणजे परत गरिबीला आमंत्रण देणे. बालविवाहाचे धोके, बालविवाहाचे दुष्परिणाम उदाहरणासहित , तसेच बालविवाह प्रतिबंधासाठी नागरिकांची भुमिका याबाबत मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात आली. यावेळी संरपंच डी. डी. जाधव, उपसंरपंच प्रशांत देशमुख, पोलीस पाटील एकनाथ काशिद, यांनी मार्गदर्शन केले. गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला मिठु नन्नवरे, सचिन मगरे, साहेबराव धारे, किशोर शिंदे, संजय मांडे, व गोरख राठोड आदी मान्यवर उपस्थित हो




















