Homeताज्या बातम्यावीज दरवाढीविरोधात ‘माझं गाव माझा अभिमान’चा एल्गारतहसीलदारांना निवेदन;

वीज दरवाढीविरोधात ‘माझं गाव माझा अभिमान’चा एल्गारतहसीलदारांना निवेदन;

१ मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

 

कोपरगाव, दि.८.( दिलीप गायकवाड )

 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)कडून करण्यात आलेल्या वीज दरवाढीविरोधात तसेच वीज बिलामधील अवाढव्य शुल्कांविरोधात ‘माझं गाव माझा अभिमान’ अभियानाने एल्गार पुकारला आहे. कोपरगाव तालुका व शहरातील जागरूक नागरिकांनी याबाबत तहसीलदार, कोपरगाव यांना निवेदन देत वीज दर कमी करण्याची मागणी केली आहे.

 

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील वीज दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दिल्लीसारख्या राज्यात ४०० युनिटपर्यंतच्या वापरावर सवलत देण्यात येत असल्यामुळे तेथील नागरिकांना कमी बिल भरावे लागते. मात्र महाराष्ट्रात तितक्याच वापरासाठी १२०० ते १५०० रुपये बिल येत असल्याने सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडत आहे.

 

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही २०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी किंवा बिलामध्ये किमान ५० टक्के सवलत द्यावी, वीज बिलातील ‘वहन आकार’ तातडीने रद्द करावा, मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिले पाठवण्याचे प्रकार थांबवून प्रत्यक्ष रीडिंगनुसारच बिल द्यावे, तसेच वीज बिलातील ‘स्थिर आकार’ कमी करून पारदर्शक पद्धत लागू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

दरम्यान, या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास येत्या १ मे , २०२६ (महाराष्ट्र दिन) पर्यंत निर्णय न झाल्यास कोपरगाव तहसील कार्यालयासमोर समस्त वीज ग्राहकांच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा माझं गाव माझा अभिमानचे नेते, विनय भगत,आणि सहकार्यानी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...
error: Content is protected !!