कोपरगाव, दि.१६ : दिलीप गायकवाड
कोपरगाव शहरात स्वातंत्र्यदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पारशी नूतनवर्ष अशा धार्मिक व राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशीही काही बियर बार आणि हॉटेल्स उघडे असल्याचे दिसून आले आहे.
शासनाने या दिवसांसाठी ‘ड्राय डे’ जाहीर केलेला असतानाही, नगर-मनमाड महामार्गावरील काही रेस्टॉरंट्स व हॉटेल्समध्ये धडाक्यात मद्यविक्री सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितल त्यानुसार पाहाणी केली असता हे सत्य समोर आले.
१५ ऑगस्ट रोजी काही हॉटेल मालक ग्राहकांसमोर उभे राहून सहजतेने सेवा देत असल्याचे दिसून आल्यामुळेच नागरिकांनी संतप्त व्यक्त करत “ही हॉटेल्स कधीच बंद नसतात, यांची मोठी दहशत आहे,” असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
शहरात दुसरीकडे शाळकरी मुलांच्या प्रभातफेऱ्या, भजन, ध्वजारोहण समारंभ, पंतप्रधानांचे थेट प्रक्षेपण अशा देशभक्तीच्या वातावरणात कार्यक्रम सुरू असताना, काही हॉटेल मालकांनी मात्र निर्भयपणे व्यवसाय सुरू ठेवला. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे कोपरगाव तहसील कार्यालय, नगरपरिषद आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांनी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “या हॉटेल्सवर कारवाई का होत नाही? पोलिसांकडूनच दुर्लक्ष का होते?” असा संतप्त प्रश्न शहरवासीय उपस्थित करत आहे.१५ऑगस्ट २५,रोजी जे मद्यविक्री हॉटेल्स सुरू होती यावर काय करवाई होणार या कडे कोपरगाव नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















