Homeताज्या बातम्याबिनविरोध विजयी उमेदवारीमुळे लोकशाही धोक्यात – साईनाथ खरात 

बिनविरोध विजयी उमेदवारीमुळे लोकशाही धोक्यात – साईनाथ खरात 

ठाणे,दि.३.( प्रतिनिधी )

लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या बिनविरोध विजयी उमेदवारीच्या वाढत्या प्रवृत्तीवर आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ खरात यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सातत्याने बिनविरोध विजयी उमेदवार निवडून येणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

लोकशाही ही लोकांची, लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालणारी शासनपद्धती आहे. मात्र आज अनेक ठिकाणी निवडणूक ही केवळ औपचारिकता उरली असून, स्पर्धा, मतदान आणि जनतेचा थेट सहभागच नसल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने मतदारांचा निवड करण्याचा अधिकार हिरावला जात आहे, असे साईनाथ खरात म्हणाले.

“बिनविरोध निवड कायद्याने चुकीची नसली, तरी ती सातत्याने होत राहिली तर लोकशाही कमकुवत होते. कारण जनतेचा आवाज मतदान पेटीत पोहोचतच नाही,” असे ते म्हणाले. काही ठिकाणी राजकीय दबाव, दडपशाही आणि भीतीचे वातावरण निर्माण करून विरोधी उमेदवार उभे राहू दिले जात नसल्याचे आरोपही त्यांनी यावेळी केले.

लोकशाहीमध्ये मतदार जितका जागरूक असणे आवश्यक आहे, तितकेच महत्त्व निवडणूक लढवण्याच्या स्वातंत्र्याला आहे. “जर स्पर्धाच नसेल, तर विकासाचा जाब कोण विचारणार? लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा हिशोब कोण घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणुका खर्‍या अर्थाने स्पर्धात्मक व्हायला हव्यात, मतदारांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करताना साईनाथ खरात म्हणाले, “मतदान नसेल तर लोकशाही फक्त कागदावर उरेल.”

हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून संपूर्ण व्यवस्थेचा आहे. लोकशाही वाचवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक मतदाराने आपला हक्क ओळखून निर्भयपणे तो वापरणे गरजेचे आहे, असे आवाहन खरात यांनी शेवटी बोलत असताना केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

विक्रोळीतील ६१० घरे आता फक्त HIG साठी; म्हाडाची अर्ज प्रक्रियेला २८ मेपर्यंत मुदतवाढ

म्हाडाचा मोठा निर्णय; अर्जाची मुदतही वाढवली मुंबई : मंगेश म्हात्रे मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर...

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीने पकड घट्ट केली, राष्ट्रवादीच्या...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

नक्षलग्रस्त भागात २४ वर्षे आरोग्यसेवेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला सोयम कोण? राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय...

नवी दिल्ली महाराष्ट्रातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात गेली तब्बल २४ वर्षे निस्वार्थ आरोग्यसेवा देणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम या अचानक राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्या आहेत....

खासगी बसवाल्यांची मनमानी आता बंद? अवैध ट्रॅव्हल ॲप्स विरोधात सरकारचा मोठा ‘ॲक्शन प्लॅन’

तिकीट दरांची लूट थांबवा; परिवहन मंत्र्यांचा थेट आदेश मुंबई -मंगेश म्हात्रे प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून आर्थिक लूट करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर राज्य सरकारने आता...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

विक्रोळीतील ६१० घरे आता फक्त HIG साठी; म्हाडाची अर्ज प्रक्रियेला २८ मेपर्यंत मुदतवाढ

म्हाडाचा मोठा निर्णय; अर्जाची मुदतही वाढवली मुंबई : मंगेश म्हात्रे मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर...

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीने पकड घट्ट केली, राष्ट्रवादीच्या...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

नक्षलग्रस्त भागात २४ वर्षे आरोग्यसेवेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला सोयम कोण? राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय...

नवी दिल्ली महाराष्ट्रातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात गेली तब्बल २४ वर्षे निस्वार्थ आरोग्यसेवा देणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम या अचानक राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्या आहेत....

खासगी बसवाल्यांची मनमानी आता बंद? अवैध ट्रॅव्हल ॲप्स विरोधात सरकारचा मोठा ‘ॲक्शन प्लॅन’

तिकीट दरांची लूट थांबवा; परिवहन मंत्र्यांचा थेट आदेश मुंबई -मंगेश म्हात्रे प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून आर्थिक लूट करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर राज्य सरकारने आता...
error: Content is protected !!