Homeताज्या बातम्याबिनविरोध विजयी उमेदवारीमुळे लोकशाही धोक्यात – साईनाथ खरात 

बिनविरोध विजयी उमेदवारीमुळे लोकशाही धोक्यात – साईनाथ खरात 

ठाणे,दि.३.( प्रतिनिधी )

लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या बिनविरोध विजयी उमेदवारीच्या वाढत्या प्रवृत्तीवर आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ खरात यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सातत्याने बिनविरोध विजयी उमेदवार निवडून येणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

लोकशाही ही लोकांची, लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालणारी शासनपद्धती आहे. मात्र आज अनेक ठिकाणी निवडणूक ही केवळ औपचारिकता उरली असून, स्पर्धा, मतदान आणि जनतेचा थेट सहभागच नसल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने मतदारांचा निवड करण्याचा अधिकार हिरावला जात आहे, असे साईनाथ खरात म्हणाले.

“बिनविरोध निवड कायद्याने चुकीची नसली, तरी ती सातत्याने होत राहिली तर लोकशाही कमकुवत होते. कारण जनतेचा आवाज मतदान पेटीत पोहोचतच नाही,” असे ते म्हणाले. काही ठिकाणी राजकीय दबाव, दडपशाही आणि भीतीचे वातावरण निर्माण करून विरोधी उमेदवार उभे राहू दिले जात नसल्याचे आरोपही त्यांनी यावेळी केले.

लोकशाहीमध्ये मतदार जितका जागरूक असणे आवश्यक आहे, तितकेच महत्त्व निवडणूक लढवण्याच्या स्वातंत्र्याला आहे. “जर स्पर्धाच नसेल, तर विकासाचा जाब कोण विचारणार? लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा हिशोब कोण घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणुका खर्‍या अर्थाने स्पर्धात्मक व्हायला हव्यात, मतदारांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करताना साईनाथ खरात म्हणाले, “मतदान नसेल तर लोकशाही फक्त कागदावर उरेल.”

हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून संपूर्ण व्यवस्थेचा आहे. लोकशाही वाचवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक मतदाराने आपला हक्क ओळखून निर्भयपणे तो वापरणे गरजेचे आहे, असे आवाहन खरात यांनी शेवटी बोलत असताना केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!