Homeताज्या बातम्यासायनच्या जी.टी.बी. नगर पुनर्विकासाला गती; ६३५ चौरस फुटांची घरे, ४८ मजली टॉवर्स...

सायनच्या जी.टी.बी. नगर पुनर्विकासाला गती; ६३५ चौरस फुटांची घरे, ४८ मजली टॉवर्स उभारणार

मुंबई : मंगेश म्हात्रे

सायनमधील गुरु तेग बहादुर नगर (जी.टी.बी. नगर) समूह पुनर्विकास प्रकल्पाला अखेर वेग मिळाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे येथील रहिवाशांना ६३५ चौरस फुटांची आधुनिक आणि सुसज्ज घरे मिळणार असून प्रकल्पाचा विकास किस्टोन रिअल्टर्स (रुस्तुमजी समूह) यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.

म्हाडा आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी यांच्यात त्रिपक्षीय विकास करार पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा करार करण्यात आला.

सुमारे ११.२० एकर जागेवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात ३९ ते ४८ मजली तीन आधुनिक निवासी टॉवर्स उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पातून सुमारे १२०० लाभार्थ्यांना विनामूल्य ६३५ चौरस फुटांची सदनिका मिळणार आहे. यासोबतच गेटेड कम्युनिटी, बहुमजली पार्किंग, हिरवळ, तसेच आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

बांधकामास प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पात्र रहिवाशांना दरमहा २० हजार रुपये भाडे अनुदान दिले जाणार आहे. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षे इमारतींची देखभाल आणि व्यवस्थापनाची जबाबदारी म्हाडा पार पाडणार असल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे २०२० मध्ये येथील इमारती धोकादायक घोषित झाल्यानंतर त्या पाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर रहिवाशांच्या मागणीनुसार हा पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधांमुळे जी.टी.बी. नगर पुनर्विकास प्रकल्प भविष्यातील पुनर्विकास योजनांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...
error: Content is protected !!