Homeताज्या बातम्याअनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी व्यापक लढ्याची गरज – प्रा. रामचंद्र भरांडे लोकस्वराज...

अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी व्यापक लढ्याची गरज – प्रा. रामचंद्र भरांडे लोकस्वराज आंदोलन वतीने दि.२७ एप्रिल २०२६,मुंबई आझाद मैदान येथे होणार आंदोलन. 

शिर्डी,दि.११.( दिलीप गायकवाड )

 

अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन टाळाटाळ करत असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी व्यापक लढा उभारण्याची गरज असल्याचे मत लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांनी व्यक्त केले.

लोकस्वराज्य आंदोलन व समविचारी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीस अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने २७ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक घेण्यात आली.

 

यावेळी बोलताना प्रा. भरांडे म्हणाले की, वंचित घटकांना न्याय मिळावा म्हणून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाचे स्वप्न पाहिले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करून ते प्रत्यक्षात आणले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांतही अनेक समाजघटक आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अनेक राज्यांनी त्याची अंमलबजावणीही केली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमून दोन वेळा मुदतवाढ देत निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब केला असल्याची टीका त्यांनी केली.

येत्या २७ एप्रिल रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या मोर्चात एक लाख समाजबांधव सहभागी झाल्यास शासनाला आरक्षणाचे वर्गीकरण करावेच लागेल. निर्णय जाहीर होईपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

 

बैठकीस राजेंद्र त्रिभुवन, रामभाऊ पिंगळे, भाऊसाहेब आव्हाड, भागचंद नवगिरे, सागर भोंडगे, अर्जुन मरसाळे, संजय बोरुडे, संजय शिर्डीकर, भाऊराव साळवे, रवी कांबळे, अ‍ॅड. सौ. सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. नितीन पोळ यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...
error: Content is protected !!