Homeताज्या बातम्याकोपरगावात ' तांडेल बंगला ' शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था

कोपरगावात ‘ तांडेल बंगला ‘ शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था

कोपरगाव,दि.११.दिलीप गायकवाड

 

कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठी असलेले शासकीय विश्रामगृह अर्थात तांडेल बंगला सध्या दुर्लक्षित अवस्थेत असल्याने तो विश्रामगृह राहिला की भूत बंगला झाला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दोन दिवसांपूर्वी या शासकीय विश्रामगृहाच्या दुरवस्थेबाबत लेख प्रसिद्ध झाल्यानंतर तालुक्यातील अनेक जागरूक नागरिकांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत या प्रश्नाला वाचा फोडल्याचे सांगितले.

 

गोदावरी नदीच्या निसर्गरम्य काठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने उभारण्यात आलेला तांडेल बंगला एकेकाळी राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुक्कामासाठी प्रसिद्ध होता. या ठिकाणी अनेक बैठका आणि चर्चांमधून जनतेच्या समस्या थेट वरिष्ठ पातळीवर पोहोचत असत. येथून अनेक प्रश्न राज्याच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये — विधानसभा आणि विधान परिषदेत — मांडले गेले होते.

 

मात्र गेल्या वीस ते पंचवीस वर्षांत कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खर्च करूनही या विश्रामगृहाच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याची टीका होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या बंगल्याची स्थिती दिवसेंदिवस खालावत असून, विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांसाठी ही बाब लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

 

तांडेल बंगला योग्य प्रकारे दुरुस्त करून सुस्थितीत ठेवला तर शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहाला तो उत्तम पर्याय ठरू शकतो. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था येथे होऊ शकते. मात्र तसे होऊ नये यासाठीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीवर खर्च झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्याचे कोणतेही काम दिसून येत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तांडेल बंगला भूत बंगला होण्यास नेमके कोण जबाबदार, असा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

 

*अँड. नितीन पोळ यांची मागणी :*

तांडेल बंगला तातडीने दुरुस्त करून तो सर्व सुविधांसह पुन्हा सुरू करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने या विश्रामगृहाच्या देखभाल-दुरुस्तीवर झालेल्या खर्चाची चौकशी करून अहवाल जाहीर करावा. तसेच कोपरगाव शहर व परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना उपयोगी पडेल अशा पद्धतीने तांडेल बंगल्याचा विकास करण्यात यावा, अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड. नितीन पोळ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!