Homeताज्या बातम्याजात प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी जुन्या शालेय नोंदींच्या डिजिटल जतनाची मागणी

जात प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी जुन्या शालेय नोंदींच्या डिजिटल जतनाची मागणी

आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांना निवेदन; राज्यस्तरीय डिजिटल अभिलेखागार उभारण्याची अपेक्षा

मुंबई, दि. ४. (प्रतिनिधी):
राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग (OBC) तसेच विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात जुन्या शालेय नोंदींचे डिजिटल जतन करून त्या जात पडताळणी प्रक्रियेत अधिकृत पुरावा म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी १९५०, १९६१ आणि १९६७ किंवा त्यापूर्वीच्या शालेय नोंदी जात सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र, या नोंदी आजही बहुतांश शाळांमध्ये कागदी स्वरूपात असून त्या कालांतराने जीर्ण, अस्पष्ट किंवा नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित व खासगी शाळांमधील जुन्या प्रवेश नोंदवही, शालेय दाखले आणि संबंधित अभिलेखांचे तातडीने स्कॅनिंग करून त्यांचे सुरक्षित डिजिटल जतन करावे, राज्यस्तरीय डिजिटल अभिलेखागार उभारावे आणि नागरिकांना आवश्यकतेनुसार प्रमाणित डिजिटल प्रती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या डिजिटल नोंदींना जात प्रमाणपत्र व जात वैधता पडताळणी प्रक्रियेत अधिकृत पुरावा म्हणून मान्यता देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

यासंदर्भात संबंधित मंत्री, प्रशासकीय अधिकारी, जात पडताळणी समित्यांचे प्रतिनिधी, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करून आवश्यक धोरण निश्चित करावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे ऐतिहासिक अभिलेखांचे संरक्षण होईल, बनावट कागदपत्रे व जात घुसखोरीला आळा बसेल तसेच पात्र नागरिकांना न्याय मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

हे निवेदन विजय माने, अध्यक्ष, ईशान्य मुंबई जिल्हा, रिपब्लिकन सेना यांनी सादर केले. यावेळी अमित साळुंखे, हर्षल पाटील, अॅड. सुमेश परमार, अॅड. श्याम शुक्ला, अॅड. मेघनाथ तेलावडे, राजेश शर्मा, अजय बरुचा आणि अश्विन पाटणे उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...
error: Content is protected !!