Homeताज्या बातम्यावीज दरवाढीविरोधात ‘माझं गाव माझा अभिमान’चा एल्गारतहसीलदारांना निवेदन;

वीज दरवाढीविरोधात ‘माझं गाव माझा अभिमान’चा एल्गारतहसीलदारांना निवेदन;

१ मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

 

कोपरगाव, दि.८.( दिलीप गायकवाड )

 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)कडून करण्यात आलेल्या वीज दरवाढीविरोधात तसेच वीज बिलामधील अवाढव्य शुल्कांविरोधात ‘माझं गाव माझा अभिमान’ अभियानाने एल्गार पुकारला आहे. कोपरगाव तालुका व शहरातील जागरूक नागरिकांनी याबाबत तहसीलदार, कोपरगाव यांना निवेदन देत वीज दर कमी करण्याची मागणी केली आहे.

 

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील वीज दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दिल्लीसारख्या राज्यात ४०० युनिटपर्यंतच्या वापरावर सवलत देण्यात येत असल्यामुळे तेथील नागरिकांना कमी बिल भरावे लागते. मात्र महाराष्ट्रात तितक्याच वापरासाठी १२०० ते १५०० रुपये बिल येत असल्याने सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडत आहे.

 

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही २०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी किंवा बिलामध्ये किमान ५० टक्के सवलत द्यावी, वीज बिलातील ‘वहन आकार’ तातडीने रद्द करावा, मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिले पाठवण्याचे प्रकार थांबवून प्रत्यक्ष रीडिंगनुसारच बिल द्यावे, तसेच वीज बिलातील ‘स्थिर आकार’ कमी करून पारदर्शक पद्धत लागू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

दरम्यान, या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास येत्या १ मे , २०२६ (महाराष्ट्र दिन) पर्यंत निर्णय न झाल्यास कोपरगाव तहसील कार्यालयासमोर समस्त वीज ग्राहकांच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा माझं गाव माझा अभिमानचे नेते, विनय भगत,आणि सहकार्यानी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...
error: Content is protected !!