Homeताज्या बातम्याकोपरगाव गोदावरी नदीचे पाणी भीषण प्रदूषित : संजय काळे यांचा गंभीर आरोप

कोपरगाव गोदावरी नदीचे पाणी भीषण प्रदूषित : संजय काळे यांचा गंभीर आरोप

कोपरगाव, दि.८.( दिलीप गायकवाड )

 

कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे तसेच कालव्यांचे पाणी अत्यंत भीषण स्वरूपात प्रदूषित झाले असल्याचा गंभीर आरोप सामाजिक नेते संजय काळे यांनी केला आहे. गोदावरी नदीत नारंदी, गारदा या उपनद्या तसेच विविध नाले, ओढे आणि शहरातील गटारांमधून मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत असल्यामुळे नदी व कालव्यांचे पाणी वापरण्यायोग्य राहिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संजय काळे यांनी गेल्या आठवड्यात गोदावरी नदी, कालवे, नारंदी व गारदा नाल्यातून विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करून ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. प्राप्त अहवालानुसार कालव्याच्या पाण्यात क्षारता, बायकार्बोनेट, क्लोराईड यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून आले आहे. गोदावरी नदीतील पाण्यातही हे घटक मर्यादेपेक्षा अधिक असल्याने हे पाणी शेतीसाठी वापरल्यास शेतजमिनीचे दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

 

गारदा नाल्यात संजीवनी कारखाना, गोदावरी डेअरी, महाविद्यालये तसेच औद्योगिक वसाहतींचे सांडपाणी थेट सोडले जात असल्याचा आरोप करत, गारदा नाल्याचा अहवाल अत्यंत धोकादायक असल्याचे काळे यांनी सांगितले. नारंदी नदीचे पाणीही अत्यंत दूषित असून त्यात रासायनिक घटकांचे प्रमाण जास्त असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

 

या प्रदूषित पाण्यामुळे शेती, पशुधन, जलचर जीवसृष्टी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे पाणी जमिनीत मुरल्याने शहरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून दीर्घकालीन आजारांना आमंत्रण मिळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

गोदावरी नदी व कालवे हे कोपरगाव तालुक्याच्या विकासाची मुख्य शिरा असून त्यांचे संरक्षण आणि प्रदूषणमुक्ती तातडीने होणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी तात्काळ दखल घेऊन सांडपाणी थेट नदीत सोडण्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!