Homeताज्या बातम्यापैठण तालुक्यात ९५ हजार हेक्टरला अतिवृष्टीचा फटका..

पैठण तालुक्यात ९५ हजार हेक्टरला अतिवृष्टीचा फटका..

फळबागांसह अनेक पिकांना मोठा फटका, शेत गेले खरडुन, शेतकरी हवालदिल.

पैठण ता ;(अभिजित सोनवणे)

पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सतत अतिवृष्टी आणी ढगफुटीसद्दृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील ९५ हजार हेक्टरवरील सोयाबीन,ऊस, मका, कापुस, बाजरी, तुर, उडीद, भाजीपाला, फळबागांनमध्ये मोसंबी, डाळिंब, सीताफळ, आदी फळबागांचे प्राथमिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.


तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार मुसळधार पावसाने हाहाकर माजवला होता. अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेतिपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे ९५ हजार हेक्टरवरील पिकांसह शेतकरी बाधित झाले आहेत. तालुका प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आकडेवारीनुसार संपूर्ण पंचनामाचे अहवाल हाती आल्यानंतर खरी आकडेवारी समोर येईल. पैठण तालुक्यात महापुरामुळे १२ मंडळातील ११० गावातील सुमारे ९५ हजार २८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे. अशी माहिती तहसीलदार जोत्यी पवार यांनी दिली आहे. गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे गोदाकाठ परिसरातील ग्रामीण भागातील १,६५०० हजार घरात पाणी शिरले होते. यात् एकटा मायगावमध्ये सर्वाधिक घर पाण्याखाली गेली आहेत. याशिवाय पैठण शहरातील सुमारे ५०० दुकाने आणी ९०० घरे पुराच्या पाण्याखाली गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील अनेक रस्ते उखडले असुन पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जोडणारा महामार्गावरील पाटेगाव गावाजवळीर पुल पुर्णपणे उखडला असुन नादुरुस्त झाला आहे.
डोळ्यांदेखत उभी पिके झाली भुईसपाट,
*गेल्या पंधरा दिवसांपूर्वी परिसरात अधिक अतिवृष्टी व ढगफुटीसद्दृश्य पाऊस झाला.
*त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील उभी पिके पाण्याखाली भुईसपाट झाली आहेत. स्थानिकांनी माहीती देतांना सांगितले आहे. आठ ते दहा वर्षांत हा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
** पावसामुळे ग्रामस्थ, औद्योगिक वसाहतीतील कामगार, दुध उत्पादक शेतकरी यांचे आंतर्नात हाल झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!